शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपूरमधून पळालेली अल्पवयीन मुले नाशकात गवसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:24 IST

नाशिक : नागपूर शहरातून तिघे अल्पवयीन मुले घरातून पळून जाऊन एका रेल्वेतून शहराबाहेर जाण्यासाठी प्रवास करत होते. याबाबतचा संदेश प्राप्त होताच, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आलेली गीतांजली एक्स्प्रेस (क्र.०२२६०) रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त पथकाने (आरपीएफ व जीआरपीएफ) पिंजून काढत, तिघांना एस-४ क्रमांकाच्या कोचमधून ताब्यात घेत सुरक्षितरीत्या स्थानकावर उतरवून घेण्यात आले.

ठळक मुद्देगीतांजली एक्स्प्रेसमधून करत होते प्रवास : रेल्वे पोलिसांची खबरदारी अन‌् सतर्कता

नाशिक : नागपूर शहरातून तिघे अल्पवयीन मुले घरातून पळून जाऊन एका रेल्वेतून शहराबाहेर जाण्यासाठी प्रवास करत होते. याबाबतचा संदेश प्राप्त होताच, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आलेली गीतांजली एक्स्प्रेस (क्र.०२२६०) रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त पथकाने (आरपीएफ व जीआरपीएफ) पिंजून काढत, तिघांना एस-४ क्रमांकाच्या कोचमधून ताब्यात घेत सुरक्षितरीत्या स्थानकावर उतरवून घेण्यात आले.नागपूरच्या गोपालनगर येथील रहिवाशी असलेले १५ ते १६ वर्षे वयोगटांतील तिघेही मित्र अचानकपणे त्यांच्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. तिघा अल्पवयीन मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून न आल्याने त्यांनी नागपूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. यानुसार, तिघे मुले बेपत्ता झाल्याची तक्रार प्रतापनगर पोलिसांनी नोंदवून घेत, त्यांची छायाचित्रे, आधार्ड कार्डाचे फोटो काढून घेत, ते सर्व पोलीस ठाण्यांसह रेल्वे पोलिसांना तत्काळ व्हायरल केले. या छायाचित्रांवरून या तिघा मुलांचा पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाकडून शोध सुरू झाला. दरम्यान, शनिवारी (दि.१३) हा संदेश नाशिक रेल्वे पोलिसांपर्यंत येऊन धडकला. रेल्वे सुरक्षा दल व गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.

या पथकाने गीतांजली एक्स्प्रेसची झडती घेण्यास सुरुवात केली. जळगाव सोडल्यानंतर या रेल्वेच्या एका बोगीत ही तिन्ही मुले बसलेली पथकाला आढळून आली. त्यांनी मोबाइलमध्ये असलेल्या छायाचित्रांवरून त्यांची ओळख पटवून त्यांना विश्वासात घेतले. नाशिकरोड येथे संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गीतांजली एक्स्प्रेस पोहोचताच या मुलांना पथकाने सुखरूपपणे उतरवून आरपीएफ पोलीस ठाण्यात आणले. तेथून नागपूर प्रातपनगर पोलिसांना याबाबत वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून तिन्ही मुले सापडल्याची माहिती कळविण्यात आली.

या तीनही मुलांना रेल्वे पोलिसांनी सुरक्षितरीत्या बाल कल्याण समितीकडे सोपविले. दरम्यान, या तीनही मुलांचे पालक नाशकात आल्यानंतर, समितीकडून पुढील कार्यवाही करून तिघांना त्यांच्या पालकांकडे सोपविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेPoliceपोलिस