शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाका : तपमानाचा पारा ९.४ अंशापर्यंत घसरला; हंगामातील नीचांकी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:09 IST

हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले

ठळक मुद्दे दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणारकिमान तपमानाची नीचांकी नोंद प्रथमच नाशिकमध्येनाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर

नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. नाशिकला थंडीचा कडाका वाढला असून पुढील दोन दिवस किमान तपमानात घसरण कायम राहणार असल्याने नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार आहे.राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तपमान १२.८ तर कमाल तपमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तपमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीची तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला. त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशापर्यंत तर कि मान तपमान ११.२ अंशापर्यंत घसरले होते. त्यानंतर सातत्याने किमान तपमानासह कमाल तपमान सलग चार दिवस कमी राहिले. २८.२ अंशापर्यंत कमाल तपमान खाली घसरले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तपमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती; मात्र अचानकपणे ३१ अंशापर्यंत पोहचलेला कमाल तपमानाचा पारा थेट सोमवारी २८.२ अंशापर्यंत घसरला तर किमान तपमान १३.४ अंशावरून १२.२ अंशापर्यंत खाली आले. वातावरणात सोमवारी सकाळी ७६ टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण हवामान केंद्राकडून मोजण्यात आले. एकूणच हवामानात बदल झाला असून नागरिकांना हिवाळा चांगलाच अनुभवयास येऊ लागला आहे. राज्यात आतापर्यंत या हंगामात किमान तपमानाची नीचांकी नोंद प्रथमच नाशिकमध्ये झाली. निफाड तालुक्यात अचानकपणे पारा नऊ अंशापर्यंत सोमवारी घसरला होता. त्यामुळे तालुका गारठला असून, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. ही थंडी गहू, कांदे या पिकांच्या दृष्टीने पोषक ठरणार आहे.थंडीचा कडाका वाढताच शहरात वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. स्वेटर, जॅकेट, टोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे यांसारख्या उबदार कपड्यांच्या खरेदीवर नाशिककर भर देत आहेत. थंडी वाढल्यामुळे निफाडसह शहरी भागातदेखील रात्रीच्या शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मंगळवारी सकाळी किमान तपमान अधिकच घसरले. पारा थेट ९.४अंशापर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. सकाळी नाशिककर संपुर्णत: उबदार कपड्यांनी पॅक होऊनच घराबाहेर पडले.दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाकाशहराचे हवामान अचानकपणे बदलले असून येत्या दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असून गुरूवारनंतर (दि.१३) किमान तपमानात १अंशाने वाढ होऊ शकते असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेचा सामना गुरूवारपर्यंत करावा लागू शकतो. कमाल तपमान वाढल्यास काही अंशी वातावरणात उष्मा निर्माण होऊन थंडीपासून दिलासा मिळू शकेल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान