शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

पावसाची अत्यल्प हजेरी : कृषी विभागाने केले बियाण्यांचे नियोजन

By admin | Updated: July 8, 2015 23:59 IST

दुबार पेरणीचे संकट कायम

नाशिक : राज्याच्या हवामान खात्याने ४८ तासांत मान्सून सक्रिय होण्याचा इशारा दिल्यानंतर कालपासून शहर व जिल्ह्यात तुरळक स्वरूपात का होईना, पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. मात्र तरीही आणखी दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट खरीप हंगामात बळीराजासमोर आहे.दरम्यान, जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास आवश्यक त्या बियाणे व खतांच्या नियोजनाबाबत कृषी विभागाने तयारी सुरू केली असून, काल अखेर ३३ हजार ९६८९ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात भात-६७९० क्विंटल, बाजरी-४००८, सोयाबीन-६०६६, मका-१६८६८, कापूस-२३६ आदि बियाणे उपलब्ध आहेत.जिल्ह्णात खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी २ लाख २० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. भात पिकाचे सरासरी लागवडीखालील खरिपाचे पेरणी क्षेत्र ५१ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी अवघ्या ७०४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. मका पिकाचे खरिपाचे सरासरी क्षेत्र १ लाख २५ हजार १०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १ लाख ३ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९० टक्क्याहून अधिक सरासरी क्षेत्रावर लागवड झाली आहे. खरीप ज्वारीच्या १ हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी २४६ हेक्टर क्षेत्रावर, तर बाजरीच्या २ लाख २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नागली पिकाचे ३१ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी १४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भुईमुगाच्या ३० हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्णात कापसाचे ३९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाच्या ४३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार ७२३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.