शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरातून लाखोंची क्षुधाशांती : सुधीर मुतालिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 22:05 IST

    सोशल मीडियाच्या बऱ्या वाईट वापराबद्दल नेहमीच उलट सूलट चर्चा होत असतात. मात्र लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात अन्नपूर्णा ही संकल्पना फेसबुक पेजवर राबविण्यात आली आणि राज्यात अनेक ठिकणी आपापल्या परिसरात भुकेल्यांना अन्न देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. या अन्नपूर्णा कल्पनेतून लाखो भुकेल्यांना भोजन मिळू शकले. सोशल मीडियाचा वापर सकारात्मकरीतीने केला तर त्याचा असा विधायक परिणाम पुढे येतो, असे मत अन्नपूर्णा योजनेचे संकल्पक आणि नाशिकमधील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुतालिक यांनी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देलॉक डाऊन काळात अन्नपुर्णा संकल्पना वंचितांच्या मदतीसाठी विदेशातूनही प्रतिसादसोशल मिडियाचा सकारात्मक वापर

नाशिक :  गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित करण्यात आली. या एका निर्णयामुळे स्थलांतरित मजूर आणि कष्टकरीच नव्हे तर अनेक चांगल्या घरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे फेसबुकवर अन्नपूर्णा हे पेज तयार करून नागरिकांना आपल्या भागातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यातून या पेजच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील लोक एकत्र आले आणि त्यांनी व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून वंचितांना मदत देण्यास सुरूवात केली. त्याचा महिनाभरा मोठा विस्तार झाला आहे. त्याबाबत योजनेचे संकल्पक सुधीर मुतालिक यांच्याशी साधलेला संवाद.. प्रश्न: फेसबुकवर असे एखादे आवाहन करणे आणि त्यामाध्यमातून मदतीचे गट तयार करणे कसे काय शक्य झाले? मुतालिक : मला मुळात संघटनाची आवड आहे. परंतु सोशल मीडियाचा त्यासाठी  वापर करू शकतो. यावर माझा विश्वास आहे. सध्या सोशल मीडियाच्या बºया-वाईट वापराची नेहमी चर्चा होते.परंतु त्याचा विधायक वापर होऊ शकतो, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर अडचणीत असणारे आणि  यांना मदत करू शकणारे यांचा विचार करून फेसबुकवर अन्नपूर्णा पेज तयार  केले. त्यातून लोकांना आवाहन केले. आपल्या परीसरातील कोणी अडचणीत असेल तर  त्याला मदत करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी मदत माज्याकडे मागितली नाही तर आपल्या भागात जाऊन आपणच मदत करा, असे आवाहन केले. ती सर्वाधिक जमेची आणि योजना यशस्वीतेची बाजू ठरली. प्रश्न : वेगवेगळ्या जिल्ह्यात गरजवंताना मदतीचे नियोजन कसे केले? मुतालिक : फेसबुक पेजवर आवाहन केल्यांनतर अनेकांनी मदत करण्याची तयारी दर्शविली, परंतु त्याचबरोबर मदत मागणाऱ्यांनीदेखील संपर्क साधण्यास सुरुवात केली. मग त्या त्या भागात राहणाऱ्यांना मदत करण्यास सांगितले. नाशिक-पुणे आणि अन्य जिल्ह्यांतूनदेखील अनेक जण मदतीसाठी पुढे आल्याने त्यांना त्या त्या जिल्ह्याचे व्हॉट््स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यास सांगितले. त्यामुळे  आपापल्या भागातील गरजवतांची माहिती मिळू शकल्यानंतर संबंधित गरजवंत कोणाच्या घराजवळ राहतो याचा विचार करून संबंधितांना मदत केली जाऊ लागली. हेच साधे सूत्र होते. त्यातच आणखी एक भाग म्हणजे गरजवंताची गरज भागविण्यासाठी वेगळ काही करू नका केवळ आपल्या कुटुंबीयांसाठी भोजन बनविताना चार पोळ्या करणार असाल भुकेल्या व्यक्तिसाठी आणखी दोन पोळ्या तयार करा आणि त्याचीच त्याला मदत करा, असे सांगितले होते आणि त्यानुसारच घडत गेले.प्रश्न : योजनेला कसा प्रतिसाद मिळत आहे?मुतालिक : या योजनेत अनेक ठिकाणी वेगवेगळे ग्रुप तयार झाले. विधायक विचार करणाऱ्यांची साखळी तयार केली. त्यासाठी मी माझ्या उद्योजकीय संबंधांतून अनेकांना तयार केले. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी अनेक नामांकित उद्योजक तयार झालेत. पणजीतून एक फोन आला आणि कर्नाटकात शिमगो येथल एक ा दीड दिवसांपासून भुकेल्या असलेल्या नोकरदार युवकाला मदत झाली. महामाार्ग प्राधीकरणाच्या एका अधिकाऱ्याने कळविल्यानंतर दोन तासात पुण्यातच वंचित कुटुंबाला मदत झाली. या संकल्पनेला इतका प्रतिसाद मिळतोय की लंडनजवळील एका गावातूनदेखील काही मदत हवी आहे का? अशी विचारणा झाली. नाशिकमध्ये उद्योजक अविनाश आव्हाड तसेच अ‍ॅड. सुयोग शहा यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेऊन हजारो वंचितांना भोजन दिले आहे. मुलाखत - संजय पाठक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकfoodअन्नSocial Mediaसोशल मीडिया