शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कांदा सडू लागल्यामुळे लाखो रु पयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:11 IST

आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

देवळा : आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गत दोन वर्षांंपासून तोट्यात जाणाºया उन्हाळी कांद्याला यावर्षी बºयापैकी बाजारभाव असल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मोठ्या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यातच सोशल मीडियावर कांद्याच्या बाजारभावासंदर्भात दररोज येणाºया वेगवेगळ्या पोस्टमुळे शेतकºयांच्या अपेक्षा वाढून तर संभ्रम अधिकच वाढला. अनेक शेतकºयांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता आला नाही. मोठ्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला कांदा आता सडू लागला असून, काही शेतकºयांचा चाळीतील कांदा संपूर्ण सडल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चाळीत साठवणुक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणू लागल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे.पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. पावसामुळे हि रोपे खराब झाली असुन ह्या शेतकर्यांना पुन्हा उन्हाळी कांद्याचे बियाणे उपलब्ध करावे लागणार आसल्याने त्यांना भुर्दंड बसणार आहे.तालुक्यातील सर्व नद्या नाल्यांना पाणी वाहत असुन एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे व पाझरतलाव पाण्याने ओव्हर फ्लो झाली आहेत. चणकापूूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पुर पाण्यामुळे तालुक्याला चांगला लाभ झाला आहे. विहीरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रब्बी हंंगामासाठी शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता झाली आहे.