शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कांदा सडू लागल्यामुळे लाखो रु पयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:11 IST

आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

देवळा : आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गत दोन वर्षांंपासून तोट्यात जाणाºया उन्हाळी कांद्याला यावर्षी बºयापैकी बाजारभाव असल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मोठ्या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यातच सोशल मीडियावर कांद्याच्या बाजारभावासंदर्भात दररोज येणाºया वेगवेगळ्या पोस्टमुळे शेतकºयांच्या अपेक्षा वाढून तर संभ्रम अधिकच वाढला. अनेक शेतकºयांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता आला नाही. मोठ्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला कांदा आता सडू लागला असून, काही शेतकºयांचा चाळीतील कांदा संपूर्ण सडल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चाळीत साठवणुक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणू लागल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे.पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. पावसामुळे हि रोपे खराब झाली असुन ह्या शेतकर्यांना पुन्हा उन्हाळी कांद्याचे बियाणे उपलब्ध करावे लागणार आसल्याने त्यांना भुर्दंड बसणार आहे.तालुक्यातील सर्व नद्या नाल्यांना पाणी वाहत असुन एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे व पाझरतलाव पाण्याने ओव्हर फ्लो झाली आहेत. चणकापूूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पुर पाण्यामुळे तालुक्याला चांगला लाभ झाला आहे. विहीरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रब्बी हंंगामासाठी शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता झाली आहे.