शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अंगणवाड्या बंदमुळे लाखो बालके पोषण आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:34 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा

ठळक मुद्देकोरोनामुळे कुपोषणाची शक्यता : शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५२८२ अंगणवाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाड्यांमधील सव्वातीन लाख बालके गेल्या दोन दिवसांपासून घरीच असून, यात कुपोषित बालकांचाही समावेश आहे. मुळातच कुपोषण व त्यात पोषण आहार बंद झाल्यामुळे या बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आले नसल्याने एकात्मिक बाल विकास विभागही हतबल झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमुळे ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मदत होत असली तरी, अंगणवाड्यांमधील बालकांची मात्र हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५२८२ अंगणवाड्या असून, त्यात सुमारे सव्वा तीन लाख बालके दाखल आहेत. या बालकांना सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकांमार्फत आरोग्याची काळजी, पोषण आहार दिला जातो. मुख्यत्वे करून या अंगणवाड्यांमध्ये ग्रामीण भागातील व त्यातल्या त्यात आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे. कुटुंबाकडून बालकांचे आरोग्य व उदरभरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या बालकांच्या आरोग्याची काळजी म्हणून अंगणवाड्यांच्या माध्यमातून त्याचे पोषण केले जात आहे. तथापि, गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगणवाड्या बंद करण्यात आल्याने बालकांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आले आहे. काही बालकांचे आई-वडील दिवसा शेतीकामासाठी बाहेर जात असल्यामुळे या बालकांच्या पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना पोषण आहार व वैद्यकीय औषधांपासूनही वंंचित रहावे लागत असून, त्यात कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत या बालकांना औषध पुरवठा केला जात असला तरी, पोषण आहार बंद झाल्याने या बालकांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद