शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

अंगणवाड्या बंदमुळे लाखो बालके पोषण आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:34 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा

ठळक मुद्देकोरोनामुळे कुपोषणाची शक्यता : शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५२८२ अंगणवाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाड्यांमधील सव्वातीन लाख बालके गेल्या दोन दिवसांपासून घरीच असून, यात कुपोषित बालकांचाही समावेश आहे. मुळातच कुपोषण व त्यात पोषण आहार बंद झाल्यामुळे या बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आले नसल्याने एकात्मिक बाल विकास विभागही हतबल झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमुळे ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मदत होत असली तरी, अंगणवाड्यांमधील बालकांची मात्र हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५२८२ अंगणवाड्या असून, त्यात सुमारे सव्वा तीन लाख बालके दाखल आहेत. या बालकांना सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकांमार्फत आरोग्याची काळजी, पोषण आहार दिला जातो. मुख्यत्वे करून या अंगणवाड्यांमध्ये ग्रामीण भागातील व त्यातल्या त्यात आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे. कुटुंबाकडून बालकांचे आरोग्य व उदरभरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या बालकांच्या आरोग्याची काळजी म्हणून अंगणवाड्यांच्या माध्यमातून त्याचे पोषण केले जात आहे. तथापि, गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगणवाड्या बंद करण्यात आल्याने बालकांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आले आहे. काही बालकांचे आई-वडील दिवसा शेतीकामासाठी बाहेर जात असल्यामुळे या बालकांच्या पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना पोषण आहार व वैद्यकीय औषधांपासूनही वंंचित रहावे लागत असून, त्यात कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत या बालकांना औषध पुरवठा केला जात असला तरी, पोषण आहार बंद झाल्याने या बालकांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद