शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुक्कुटपालन व्यवसायातून महिला शेतकऱ्याची लाखोची उलाढाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:19 IST

यशकथा : सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असलेल्या व्यवसायाने आता मोठे रूप धारण केले असून, आज त्यांची वार्षिक उलाढाल किमान ८ ते ९ लाख रुपये इतकी आहे.

- आकाश गायखे  (नाशिक) 

शेतीमधून मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही हे बघून त्यांनी पतीसमोर शेतीव्यवसायाबरोबर जोडधंदा करण्याची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही दाखविली. पतीनेही त्यांच्या कल्पनेचे आनंदाने स्वागत केले आणि सुरू झाला पोल्ट्री व्यवसाय. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असलेल्या व्यवसायाने आता मोठे रूप धारण केले असून, आज त्यांची वार्षिक उलाढाल किमान ८ ते ९ लाख रुपये इतकी आहे. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मनीषा भाऊसाहेब जाधव यांची.  

भाऊसाहेब जाधव हे शेती करतात. शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने पतीची ओढाताण होते, हे त्यांची पत्नी मनीषा यांच्या लक्षात आले. त्यासाठी शेतीला जोड व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले.. विचारमंथनानंतर कुक्कुटपालन  व्यवसाय करण्याचा निर्णय झाला आणि १९९६ साली प्राथमिक स्तरावर त्यास सुरुवात केली. 

विविध ठिकाणी भेटी देऊन व्यवसायाची सखोल माहिती घेतली. मनीषा यांनी शासनाच्या पशुसंवर्धन केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. सुरुवातीस जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ लाख रुपयांचे कर्ज घेत एकूण  सुमारे  ४ लाख रुपयांची गुंतवणूक करून ३१०० चौरस फूट जागेत शेड उभारले. सुरुवातीला २००० बॉयलर कोंबड्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली.  कोंबड्यांचे चांगले संगोपन करून त्यांची विक्री केली असता त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.

पहिल्या प्रयत्नाला आलेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर व्यवसायाचा व्याप वाढविण्यास सुरुवात केली; मात्र २००२ मध्ये अचानक आर्थिक मंदीमध्ये अडकले. त्यावेळी त्यांनी १ रुपया किलोने कोंबड्यांची विक्री केली होती. त्यावेळी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती;  परंतु  त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाने दिलेला मानसिक आधार, इतर नातेवाईक व व्यापारी वर्गाने केलेली आर्थिक मदत या जोरावर मनीषा पुन्हा उभ्या राहिल्या, पुन्हा जोमाने व्यवसाय सुरू केला. आज मनीषा जाधव यांनी   २०,००० चौरस मीटर जागेमध्ये आणखी ४ शेड उभे करून २० हजार  कोंबड्यांचे  संगोपन  करत आहेत.

कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य घरी बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यासाठी लागणारे यंत्र खरेदी केले आहे. घरच्या कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य पुरवून आता त्या नाशिक शहर, मुंबई, ठाणे तसेच गुजरात येथेही कोंबडी खाद्य विक्रीसाठी पाठवतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ८ ते ९ लाख रुपये इतके आहे. कोंबडी खताचीसुद्धा  त्या विक्री करतात.  पुढील काही दिवसात शेडची संख्या वाढवून सुमारे एक लाख कोंबड्यांचे संगोपन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कुक्कुटपालन व्यवसायामुळे स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. कुक्कुटपालन व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहिले तर खरोखरच हा फायद्याचा शेतीपूरक व्यवसाय असल्याचे मनीषा जाधव सांगतात. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी