शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दूध, भाजीपाला वाहतूक रोडावली

By admin | Updated: June 6, 2017 23:40 IST

व्यापाऱ्यांमध्ये भीती : जेमतेम टॅँकर मुंबईकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाची तीव्रता कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीतील व्यापाऱ्यांनाच शेतमालाचा लिलाव वा त्याची वाहतूक न करण्याबाबत समज दिल्यामुळे संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यातून जेमतेम दूध व भाजीपाला मुंबईकडे रवाना करण्यात आला. शेतमालाची वाहतूक करणारे वाहने आंदोलनकर्त्यांच्या रडारवर असल्यामुळे मालवाहतूकदारही धजावत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकरी संपासाठी गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीने मंगळवारी शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले होते, त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारी सायंकाळनंतर शेतमालाची वाहतूक बंद ठेवली होती. शेतमालाची वाहतूक सुरू असल्यावर आंदोलनकर्ते अधिकच संतप्त होत असल्याची भावना बाजार समित्यांनी तसेच व्यापाऱ्यांनीही यापूर्वीच व्यक्तकेली आहे. व्यापारी व स्थानिक शेतकरी यांचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहे. शेतकरी संप यशस्वी व्हावा साठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. अशात व्यापाऱ्यांनी शेतमालाचे लिलाव वा मालाची वाहतूक केल्यास त्याचा संपावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल पाठवू नये, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले होते. शेतकरी व व्यापारी यांचे संंबंध कायम राहावेत यासाठी व्यापाऱ्यांनी माल पाठविण्याबाबत हात अखडता घेतला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत माल पाठविणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्याने शेकडो ट्रक भाजीपाला, कांदा मुंबईकडे रवाना करण्यात आला, परंतु सोमवारपासून त्यात मोठी कपात झाली आहे. मंगळवारी फक्त २८ दुधाचे टॅँकर, ५५ ट्रक भाजीपाला व इतर ३० ट्रक असा शेतमाल मुंबईकडे पाठविण्यात आला आहे. सोमवार व मंगळवार असे लागोपाठ दोन दिवस मालवाहतूक रोडावल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर होण्याची शक्यता असून, विशेष करून कांद्याची वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याने कांदा महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तीन समित्यांमध्ये लिलावगेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्णातील सतराही बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णत: ठप्प झालेले असताना मंगळवारी सहाव्या दिवशी घोटी, नांदगाव व मनमाड या तीन बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी माल आणल्यामुळे अल्प प्रमाणात का होईना लिलाव सुरू करण्यात आला. घोटी येथे ३८९ क्विंटल, नांदगावला दहा व मनमाडला ३१ क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आणण्यात आला. अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र शुकशुकाट होता.