शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

दूध, भाजीपाला वाहतूक रोडावली

By admin | Updated: June 6, 2017 23:40 IST

व्यापाऱ्यांमध्ये भीती : जेमतेम टॅँकर मुंबईकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाची तीव्रता कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीतील व्यापाऱ्यांनाच शेतमालाचा लिलाव वा त्याची वाहतूक न करण्याबाबत समज दिल्यामुळे संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यातून जेमतेम दूध व भाजीपाला मुंबईकडे रवाना करण्यात आला. शेतमालाची वाहतूक करणारे वाहने आंदोलनकर्त्यांच्या रडारवर असल्यामुळे मालवाहतूकदारही धजावत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकरी संपासाठी गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीने मंगळवारी शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले होते, त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारी सायंकाळनंतर शेतमालाची वाहतूक बंद ठेवली होती. शेतमालाची वाहतूक सुरू असल्यावर आंदोलनकर्ते अधिकच संतप्त होत असल्याची भावना बाजार समित्यांनी तसेच व्यापाऱ्यांनीही यापूर्वीच व्यक्तकेली आहे. व्यापारी व स्थानिक शेतकरी यांचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहे. शेतकरी संप यशस्वी व्हावा साठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. अशात व्यापाऱ्यांनी शेतमालाचे लिलाव वा मालाची वाहतूक केल्यास त्याचा संपावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल पाठवू नये, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले होते. शेतकरी व व्यापारी यांचे संंबंध कायम राहावेत यासाठी व्यापाऱ्यांनी माल पाठविण्याबाबत हात अखडता घेतला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत माल पाठविणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्याने शेकडो ट्रक भाजीपाला, कांदा मुंबईकडे रवाना करण्यात आला, परंतु सोमवारपासून त्यात मोठी कपात झाली आहे. मंगळवारी फक्त २८ दुधाचे टॅँकर, ५५ ट्रक भाजीपाला व इतर ३० ट्रक असा शेतमाल मुंबईकडे पाठविण्यात आला आहे. सोमवार व मंगळवार असे लागोपाठ दोन दिवस मालवाहतूक रोडावल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर होण्याची शक्यता असून, विशेष करून कांद्याची वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याने कांदा महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तीन समित्यांमध्ये लिलावगेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्णातील सतराही बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णत: ठप्प झालेले असताना मंगळवारी सहाव्या दिवशी घोटी, नांदगाव व मनमाड या तीन बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी माल आणल्यामुळे अल्प प्रमाणात का होईना लिलाव सुरू करण्यात आला. घोटी येथे ३८९ क्विंटल, नांदगावला दहा व मनमाडला ३१ क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आणण्यात आला. अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र शुकशुकाट होता.