शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

दूध, भाजीपाला वाहतूक रोडावली

By admin | Updated: June 6, 2017 23:40 IST

व्यापाऱ्यांमध्ये भीती : जेमतेम टॅँकर मुंबईकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाची तीव्रता कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीतील व्यापाऱ्यांनाच शेतमालाचा लिलाव वा त्याची वाहतूक न करण्याबाबत समज दिल्यामुळे संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यातून जेमतेम दूध व भाजीपाला मुंबईकडे रवाना करण्यात आला. शेतमालाची वाहतूक करणारे वाहने आंदोलनकर्त्यांच्या रडारवर असल्यामुळे मालवाहतूकदारही धजावत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकरी संपासाठी गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीने मंगळवारी शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले होते, त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारी सायंकाळनंतर शेतमालाची वाहतूक बंद ठेवली होती. शेतमालाची वाहतूक सुरू असल्यावर आंदोलनकर्ते अधिकच संतप्त होत असल्याची भावना बाजार समित्यांनी तसेच व्यापाऱ्यांनीही यापूर्वीच व्यक्तकेली आहे. व्यापारी व स्थानिक शेतकरी यांचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहे. शेतकरी संप यशस्वी व्हावा साठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. अशात व्यापाऱ्यांनी शेतमालाचे लिलाव वा मालाची वाहतूक केल्यास त्याचा संपावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल पाठवू नये, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले होते. शेतकरी व व्यापारी यांचे संंबंध कायम राहावेत यासाठी व्यापाऱ्यांनी माल पाठविण्याबाबत हात अखडता घेतला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत माल पाठविणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्याने शेकडो ट्रक भाजीपाला, कांदा मुंबईकडे रवाना करण्यात आला, परंतु सोमवारपासून त्यात मोठी कपात झाली आहे. मंगळवारी फक्त २८ दुधाचे टॅँकर, ५५ ट्रक भाजीपाला व इतर ३० ट्रक असा शेतमाल मुंबईकडे पाठविण्यात आला आहे. सोमवार व मंगळवार असे लागोपाठ दोन दिवस मालवाहतूक रोडावल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर होण्याची शक्यता असून, विशेष करून कांद्याची वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याने कांदा महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तीन समित्यांमध्ये लिलावगेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्णातील सतराही बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णत: ठप्प झालेले असताना मंगळवारी सहाव्या दिवशी घोटी, नांदगाव व मनमाड या तीन बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी माल आणल्यामुळे अल्प प्रमाणात का होईना लिलाव सुरू करण्यात आला. घोटी येथे ३८९ क्विंटल, नांदगावला दहा व मनमाडला ३१ क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आणण्यात आला. अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र शुकशुकाट होता.