शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराअभावी मजुरांचे स्थलांतर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:11 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असताना मजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावांमध्ये रोजगाराअभावी स्थलांतर होऊ नये व प्रत्येक हाताला काम मिळावे, या हेतुने रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना तालुक्यात मजुरांना कामच नसल्यामुळे दररोज मजुरांचे स्थलांतर होत आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : कामे नसल्याने हतबलतापरिसरात नाराजीचा सूर

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असताना मजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावांमध्ये रोजगाराअभावी स्थलांतर होऊ नये व प्रत्येक हाताला काम मिळावे, या हेतुने रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना तालुक्यात मजुरांना कामच नसल्यामुळे दररोज मजुरांचे स्थलांतर होत आहे.एक तर शेतीची कामे संपली आहेत. हाताला काम नाही. गावात कामे नाहीत. रोजगार हमीची कामे नाहीत. त्यासाठी अन्यत्र स्थलांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तालुका कृषी विभाग, पंचायत समिती व वनविभाग त्र्यंबकेश्वर व हरसूल आदी शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. त्र्यंबक तालुका हा ९० टक्के आदिवासी तालुका असल्याकारणाने इथे रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत. रोजगार हमीच्या कामांची गरज असताना येथील लोकांना काम देण्यास पंचायत समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे. मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात नाशिक, सातपूर, तसेच गुजरात राज्यात होत आहे. लवकरात लवकर मजुरांना कामे द्यावे अन्यथा तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी तसेच मजुरांना घेऊन पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख समाधान बोडके यांनी यावेळी दिला. याप्रसंगी कृषी अधिकारी सुनील विटनोर, कृषी विस्तार अधिकारी स्वाती भिसे तर शिष्टमंडळात रावसाहेब कोठुळे, गोपाळ उघडे, जयराम मोंढे, शरद महाले, देवीदास पगार, निवृत्ती लिलके, उत्तम लिलके, रोजगार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवराम उघडे आदी उपस्थित होते.कामे सुरूत्र्यंबक पंचायत समितीमध्ये दगडी बांधकामे १२, रस्त्याचे १, विहिरींची ७, घरकुलांची २२७ कामे सुरू आहेत तर सेल्फवर असलेली ६८५ कामे आहेत. वनविभागाचे फक्त अंबोली येथे रोपवाटिका लावण्याचे काम सुरू आहे, तर कृषी विभागाची पूर्वीची कामे संपली असून, आता १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षात कामे सुरू होतील असे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.