शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

रोजगाराअभावी मजुरांचे स्थलांतर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:11 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असताना मजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावांमध्ये रोजगाराअभावी स्थलांतर होऊ नये व प्रत्येक हाताला काम मिळावे, या हेतुने रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना तालुक्यात मजुरांना कामच नसल्यामुळे दररोज मजुरांचे स्थलांतर होत आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : कामे नसल्याने हतबलतापरिसरात नाराजीचा सूर

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असताना मजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावांमध्ये रोजगाराअभावी स्थलांतर होऊ नये व प्रत्येक हाताला काम मिळावे, या हेतुने रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना तालुक्यात मजुरांना कामच नसल्यामुळे दररोज मजुरांचे स्थलांतर होत आहे.एक तर शेतीची कामे संपली आहेत. हाताला काम नाही. गावात कामे नाहीत. रोजगार हमीची कामे नाहीत. त्यासाठी अन्यत्र स्थलांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तालुका कृषी विभाग, पंचायत समिती व वनविभाग त्र्यंबकेश्वर व हरसूल आदी शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. त्र्यंबक तालुका हा ९० टक्के आदिवासी तालुका असल्याकारणाने इथे रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत. रोजगार हमीच्या कामांची गरज असताना येथील लोकांना काम देण्यास पंचायत समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे. मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात नाशिक, सातपूर, तसेच गुजरात राज्यात होत आहे. लवकरात लवकर मजुरांना कामे द्यावे अन्यथा तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी तसेच मजुरांना घेऊन पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख समाधान बोडके यांनी यावेळी दिला. याप्रसंगी कृषी अधिकारी सुनील विटनोर, कृषी विस्तार अधिकारी स्वाती भिसे तर शिष्टमंडळात रावसाहेब कोठुळे, गोपाळ उघडे, जयराम मोंढे, शरद महाले, देवीदास पगार, निवृत्ती लिलके, उत्तम लिलके, रोजगार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवराम उघडे आदी उपस्थित होते.कामे सुरूत्र्यंबक पंचायत समितीमध्ये दगडी बांधकामे १२, रस्त्याचे १, विहिरींची ७, घरकुलांची २२७ कामे सुरू आहेत तर सेल्फवर असलेली ६८५ कामे आहेत. वनविभागाचे फक्त अंबोली येथे रोपवाटिका लावण्याचे काम सुरू आहे, तर कृषी विभागाची पूर्वीची कामे संपली असून, आता १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षात कामे सुरू होतील असे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.