शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

विवाह मंडपातून समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:04 AM

विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.

नाशिक : विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.  नवनाथपंथी सामाजिक बहुद्देशीय संस्था व कानडे-शिंदे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव चेतन कानडे यांचा विवाह नुकताच शहरात पार पडला. त्यांचा हा विवाह चर्चेत आला तो केवळ समाजप्रबोधनाच्या संकल्पनेमुळे. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांचे टॉवेल-टोपी नव्हे, तर चक्क कापडी पिशवी आणि तुळस, अमृतवृक्ष कडुनिंबाची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्वागत कक्षाजवळ दोन्ही परिवारांच्या नावांचा स्वागत फलक नव्हे तर चक्क सुरक्षित वाहतूक व रस्ता सुरक्षेविषयीचे प्रबोधन करणारा ‘स्टॅन्डी’ पाहुण्यांच्या नजरेस पडत होता. तसेच ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’, ‘वृक्ष संवर्धन, काळाची गरज’, ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे प्रबोधनात्मक वाक्य लिहिलेल्या सचित्र फलकांनी आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.  प्लॅस्टिक वापराचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम दाखविणाºया फलकासोबत अनेकांनी ‘सेल्फी’ही घेतली.  लग्नपत्रिका घरोघरी जाऊन वाटपाची प्रथाही या कुटुंबाने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास सकारात्मक बदल घडून येतो; मात्र त्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची. या कुटुंबाने पारंपरिक विवाह सोहळ्यात अशाच प्रकारे बदल घडवत समाजप्रबोधनावर भर दिला. विवाहाच्या आमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत ‘स्मार्ट’ पद्धतीने दिले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांद्वारे तसेच भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अगत्याचे निमंत्रण आपल्या मित्र-परिवाराला दिले.‘अक्षता’  फेकू नका...विवाह सोहळ्यात ‘अक्षता फेकू नका, तर त्या अक्षता दानपात्रात टाका’ अक्षतेच्या रूपाने वाया जाणाºया धान्याच्या माध्यमातून गोरगरिबांचे एकवेळचे जेवण सहज होऊ शकते, असा सामाजिक संदेशही त्यांनी यावेळी मंडपातून दिला. या विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी वधू-वरांवर आलेल्या वºहाडी मंडळींनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक