शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

निसर्गसंवर्धनाचा लग्नपत्रिकेतून संदेश

By admin | Updated: January 10, 2016 23:01 IST

निसर्गसंवर्धनाचा लग्नपत्रिकेतून संदेश

पिंपळगाव बसवंत : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, सर्वत्र लग्नपत्रिका छपाईच्या कामात मंडळी व्यस्त आहेत. मात्र ओझर (ता. निफाड) येथील सर्पमित्रांनी स्वत:च्या लग्नपत्रिकेतून निसर्गसंवर्धनासह प्राण्यांविषयी संदेश दिला आहे. पिंपळगाव बसवंत येथील शाळेच्या मुख्याध्यापक अलका भय्यासाहेब रणशूर यांचा मुलगा सुशांत यांचा विवाह ७ फेब्रुवारीस होत आहे. सुशांत हा सर्पमित्र म्हणून परिचित आहे. सर्पमित्राबरोबरच प्राणिमात्रावर प्रेम करणाऱ्या सुशांतने आपल्या लग्नाची पत्रिका आगळीवेगळी छापून प्राणिमात्राबद्दल वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका नागाच्या फण्यावर तयार करून त्यावर महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग क्रमांक २९०४ हा छापला आहे. तसेच पत्रिकेत भारतीय राज्यघटना कलम ५१ अ (ग) मानवाच्या अस्तित्वासाठी जंगल, तलाव, नद्या आणि त्यांचे या सर्वांनी नटलेल्या निसर्गसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करून पर्यावरणातील सजीवाशी अस्मिता जोपासून नाते वृद्धिंगत करणे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य आहे, असा संदेश देण्यात आला आहे. शिवाय पत्रिकेवर बिबट्या, गिधाड, चिमणी, घुबड, फुलपाखरू, मगर आदिंचे फोटो आहेत. सध्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने लग्नपत्रिकेतून नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (वार्ताहर)