शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

पारा वाढला : उन्हाच्या तीव्रतेने शेतशिवार, रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:31 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन जणू सूर्यनारायण आग ओकत असल्याचे जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते.

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन जणू सूर्यनारायण आग ओकत असल्याचे जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. उन्हामुळे जीव कासाविस होत आहे. अंगभर घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक बेजार झाले आहेत. दैनंदिन कामकाजात बदल झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे सामान्य नागरिकांसह शेतकºयांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढणीला वेग आला आहे; परंतु उन्हाच्या प्रकोपातून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत काम करत आहे. अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत आराम व चार वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करताना दिसत आहे. गुराखी सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी घेऊन जात आहे. दुपारी नदीकिनारी किंवा शेतात झाडांच्या सावलीत जनावरे उभे करून आराम करणे पसंत करत आहे. उन्हामुळे विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. कडक उन्हामुळे शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. सकाळी पिकांना पाणी भरल्यानंतरही सायंकाळी शेतजमीन कोरडी दिसून येत आहे. पिके कशी वाचवावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.शाळांच्या वेळेत बदलउन्हाळा सुरू असल्याने शाळेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळच्या सत्रात भरवली जात आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारी आवश्यक कामासाठी बाहेर निघणारे नागरिक टोपी वा उपरण्याचा वापर करताना दिसत आहे. पंखेसुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडांच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता एवढी वाढली असून, एप्रिल-मे महिना कसा जाईल, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.

टॅग्स :Temperatureतापमान