शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पारा वाढला : उन्हाच्या तीव्रतेने शेतशिवार, रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:31 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन जणू सूर्यनारायण आग ओकत असल्याचे जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते.

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन जणू सूर्यनारायण आग ओकत असल्याचे जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. उन्हामुळे जीव कासाविस होत आहे. अंगभर घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक बेजार झाले आहेत. दैनंदिन कामकाजात बदल झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे सामान्य नागरिकांसह शेतकºयांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढणीला वेग आला आहे; परंतु उन्हाच्या प्रकोपातून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत काम करत आहे. अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत आराम व चार वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करताना दिसत आहे. गुराखी सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी घेऊन जात आहे. दुपारी नदीकिनारी किंवा शेतात झाडांच्या सावलीत जनावरे उभे करून आराम करणे पसंत करत आहे. उन्हामुळे विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. कडक उन्हामुळे शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. सकाळी पिकांना पाणी भरल्यानंतरही सायंकाळी शेतजमीन कोरडी दिसून येत आहे. पिके कशी वाचवावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.शाळांच्या वेळेत बदलउन्हाळा सुरू असल्याने शाळेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळच्या सत्रात भरवली जात आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारी आवश्यक कामासाठी बाहेर निघणारे नागरिक टोपी वा उपरण्याचा वापर करताना दिसत आहे. पंखेसुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडांच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता एवढी वाढली असून, एप्रिल-मे महिना कसा जाईल, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.

टॅग्स :Temperatureतापमान