शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

पारा वाढला : उन्हाच्या तीव्रतेने शेतशिवार, रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:31 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन जणू सूर्यनारायण आग ओकत असल्याचे जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते.

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन जणू सूर्यनारायण आग ओकत असल्याचे जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. उन्हामुळे जीव कासाविस होत आहे. अंगभर घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक बेजार झाले आहेत. दैनंदिन कामकाजात बदल झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे सामान्य नागरिकांसह शेतकºयांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढणीला वेग आला आहे; परंतु उन्हाच्या प्रकोपातून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत काम करत आहे. अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत आराम व चार वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करताना दिसत आहे. गुराखी सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी घेऊन जात आहे. दुपारी नदीकिनारी किंवा शेतात झाडांच्या सावलीत जनावरे उभे करून आराम करणे पसंत करत आहे. उन्हामुळे विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. कडक उन्हामुळे शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. सकाळी पिकांना पाणी भरल्यानंतरही सायंकाळी शेतजमीन कोरडी दिसून येत आहे. पिके कशी वाचवावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.शाळांच्या वेळेत बदलउन्हाळा सुरू असल्याने शाळेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळच्या सत्रात भरवली जात आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारी आवश्यक कामासाठी बाहेर निघणारे नागरिक टोपी वा उपरण्याचा वापर करताना दिसत आहे. पंखेसुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडांच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता एवढी वाढली असून, एप्रिल-मे महिना कसा जाईल, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.

टॅग्स :Temperatureतापमान