शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

गोदाकाठचा पारा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:17 IST

सायखेडा : थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून गोदाकाठ परिसरात सहा अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

सायखेडा : थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून गोदाकाठ परिसरात सहा अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परिपक्व द्राक्ष मन्यांना तडे जाण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.आठ दिवसांपासून थंडी कमी होऊ लागली होती मात्र दोन दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीने जोर धरला आहे.जे द्राक्ष परिपक्व होत आहे किंवा झाली आहेत , ज्या निर्यातक्षम द्राक्ष बागांना पेपर लावली आहेत, त्यांना तडे जाण्याची शक्यता आह. आणखी काही दिवस अशीच थंडी राहिल्यास तडे जाऊन विक्र ीसाठी योग्य असलेल्या बागा हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदाकाठी दोन दिवसांपासून दिवसभर हवेत गारवा असतो. सायंकाळी सहा वाजता घरांची दारे बंद होत आहे तर भल्या पहाटे काही घरासमोर शेकाट्या पेटतांना दिसू लागल्या आहेत. थंडीमुळे दिवसभर नागरिक अंगावर उबदार कपडे घालून शेतात काम करत आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. त्यात गोदाकाठ भागात गोदावरी नदीचे खोरे, मुबलक पाणी असल्याने बागायती शेती, जवळच नांदुरमधमेशवर धरण, बाणगंगा, कादवा नद्यांचा संगम, दारणसांगवी येथे दारणा नदीचा संगम यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर दव पडते. हिरवीगार शेती असल्याने थंडी पडण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते त्यामुळे दरवर्षी थंडी मोठया प्रमाणावर असते मात्र काही काळ असते. यंदा प्रथमच सलग इतक्या दिवस थंडीचा निच्चांक असल्याने त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि शेती, जनावरे यांच्यावर होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक