शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सावरकरांच्या उद्यानरूपी स्मारकाला आली अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:29 IST

सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणिक ठरला.

विलास भालेराव ।भगूर : सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणिक ठरला. कालांतराने गावालगत दारणाकाठी असलेल्या या स्मारकाला अवकळा आली असून, भिकाºयांचे ते आश्रयस्थान बनले आहे. सावरकरांचे नाव घेऊन कारभार करणाºया सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्यांचे विस्मरण होत असून, राज्य सरकारकडून निधी आल्यानंतरच स्मारकाचे काम मार्गी लागेल, असे सांगून कारभारी हात वर करीत आहेत.  भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मसमर्पण दिन सोमवारी (दि.२६) असून, त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भगूरकर उद्यानाच्या अवस्थेमुळे अस्वस्थ होतात. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा असून, त्या जवळ दारणा नदीकाठी निसर्गरम्य असे हे उद्यान १९७७-७८ मध्ये साकारण्यात आले होते. त्यावेळी पां. भा. करंजकर हे नगराध्यक्ष होते. नाशिक नगरपालिकेतील अधिकारी विशेषत: मधुकर झेंडे यांच्या सारख्या अधिकाºयाची मदत घेऊन उद्यानात आकर्षक झाडे लावण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याकाळी भगूरकरच नव्हे तर अनेकांना या उद्यानाच्या आठवणी स्मरतात. परंतु कालांतराने या उद्यानाकडे दुर्लक्ष होत गेले आणि ते लयास जाऊ लागले. त्यासाठी मध्यंतरी नवीन आराखडा तयार करण्यात आला. परंतु खर्चाचे नियोजन नसल्याने उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगूर नगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर हा मुद्दा विस्मरणात जातो. वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळीदेखील स्थानिक नेत्यांनी सत्ता आल्यास सहा महिन्यांत उद्यानाचे काम सुरू झालेले दिसेल, असा शब्द दिला होता. मात्र, वर्ष उलटले तरी हालचाल नाही, उलट राज्य सरकारकडून निधी आला की काम सुरू होईल, असे सांगून हात वर केले जात आहे. उद्यानाची सद्यस्थिती गंभीर असून या जागेत अनेक भिकारी राहात आहेत. उद्यानात शोभिवंत झाडांऐवजी गाजर गवत वाढले आहे. अत्यंत अस्वच्छ असा हा परिसर असून एकेकाळी वर्दळ असलेल्या या उद्यानाकडे जाण्यासही भगूरकर धजावत नाहीत. ही स्थिती बदलावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक