शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

सैनिकी मुले वसतिगृहात वीर जवानांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:16 IST

कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नाशिक : कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शासकीय दूध डेअरीसमोरील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिारी रामदास खेडकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी के. बी. सातपुते उपस्थित होते. यावेळी सगर म्हणाले, आपल्या जवानांच्या शौर्य, वीरता, पराक्रम आणि बिलदानाचे प्रतीक म्हणून कारगिल युद्धाकडे पाहिले जाते. सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात भारतीय सैन्याने कारगिलची शिखरे ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना हाकलून लावले होते. कारगिल युद्धात भारतीय लष्काराला आपले काही वीर जवान गमवावे लागले होते. भारताने २६ जुलै रोजी कारगिलचे युद्ध जिंकल्याने देशभरात हा दिवस कारगील युद्धाचा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपल्या नाशिकचे दोन जवान शहीद झाले असून, या दिनानिमित्ताने शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.खेडकर यांनी प्रास्ताविकात कारगिल विजय दिवसाचे महत्त्व विशद करून शहीद जवानांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास वीरमाता, पिता, वीरपत्नी यांचादेखील सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNashikनाशिक