शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

येवला वनविभागाने घडविली माय लेकरांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:20 IST

निफाड -आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवन प्रवास आहे . आईचे वात्सल्य हे तिच्या लेकराचं जीवन असं व्यापून टाकते की त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. अशा मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. त्या ताटातूट झालेल्या लेकरांना आई जेव्हा शोधून आपल्या कवेत घेते तेव्हा झालेली भेट भावभावनांचा कल्लोळ असतो. बिबट्याची मादी आणि तिच्या चार बछड्यांची झालेली भेट हा त्याचाच एक साक्षात्कार आहे.

निफाड -आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवन प्रवास आहे . आईचे वात्सल्य हे तिच्या लेकराचं जीवन असं व्यापून टाकते की त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. अशा मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. त्या ताटातूट झालेल्या लेकरांना आई जेव्हा शोधून आपल्या कवेत घेते तेव्हा झालेली भेट भावभावनांचा कल्लोळ असतो. बिबट्याची मादी आणि तिच्या चार बछड्यांची झालेली भेट हा त्याचाच एक साक्षात्कार आहे. अशीच मायलेकरांची भेट घडवून आणण्याचा निफाड तालुक्यातील तिसरा प्रयोग यशस्वी झाला आहे. येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील नागापूर येथे शरद नाठे यांच्या शेतात ऊसतोड चालू असतांना ऊसतोड कामगारांना २४ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. नाठे यांनी ही घटना येवला वन विभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने तात्काळ नाठे यांच्या शेतात धाव घेऊन हे चारही बछडे ताब्यात घेतले होते . यातील दोन बछडे नर तर दोन बछडे मादी आहेत. हे बछडे १५ दिवसाच्या आतील आहेत. त्यानंतर नाशिकचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव , नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक डॉ सिवाबाला यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन विभागाचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे , वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम एम राठोड , वनरक्षक विजय टेकणर वनरक्षक भरत पाटील , भैय्या शेख आदींचे पथकाने नाठे यांच्या शेतात हे बछडे कॅरेटमध्ये ठेऊन ते बछडे त्यांच्या आईच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. २४ मार्च रोजी बछडे सापडले, त्याच दिवशी रात्री हे बछडे एका प्लास्टिक कॅरेटमध्ये ठेऊन त्यावर एक कॅरेट ठेवण्यात आले. या शेतात मादीला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याची मादी या बछडे ठेवलेल्या कॅरेटजवळ आली. आपल्या तीन बछड्यांना तोंडात धरून एकेक करून ती घटनास्थळावरून घेऊन गेली. मात्र यातील चौथे बछडे तिथेच राहिले. त्यामुळे २५ रोजी वनविभागाने पुन्हा कॅरेटमध्ये राहिलेले चौथे बछडे ठेवले. दि २६ च्या पहाटेच्या सुमारास हे चौथे बछडे ही मादी घेऊन गेली.---------जुन्नर फॉर्म्युला तिसऱ्यांदा यशस्वीमादी आणि तिच्या बछड्यांच्या भेटीचा प्रयोग जुन्नर तालुक्यात वनविभाग करीत आहे. बिबट्याचे बछडे सापडल्यानंतर हे बछडे कॅरेटमध्ये ठेऊन ते बिबट्याच्या मादीच्या स्वाधीन केले जातात. जेणेकरून बछड्याच्या ताटातुटीने त्यांची आई हिंसक होऊन नागरिकांवर हल्ले हल्ले करणार नाही. हा जुन्नर फॉर्म्युला निफाड तालुक्यात तिसºयांदा यशस्वी झाला आह. यावर्षी येवला वन विभागाने निफाड तालुक्यातील ब्राम्हणवाडे , शिवरे येथे अशाच पद्धतीने बछडे तिच्या आईच्या ताब्यात दिले होते तर नागापूर येथे यशस्वी झालेल्या हा तिसरा प्रयोग आहे. येवला वनविभागाने मायलेकरांची भेट घडवून आणण्याच्या या तिसºया प्रयोगाचे निफाडकरांनी कौतुक केले आहे. (२७ निफाड)

टॅग्स :Nashikनाशिक