शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 15:41 IST

सिन्नर: तालुक्यातील खडांगळी येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकताच संवाद मेळावा संपन्न झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास समजावून सांगितला.

सिन्नर: तालुक्यातील खडांगळी येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकताच संवाद मेळावा संपन्न झाला.भारत दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर माजी उपसरपंच केशव कोकाटे. युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक खुळे, रंगनाथ कोकाटे, सुनील ठोक आदी उपस्थित होते.भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांना कांदा बियाणे टाकण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत येत असलेल्या समस्या व त्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास समजावून सांगितला. ज्या शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करायची असेल त्यांनी आता यापुढे कांदा बियाणे सुद्धा स्वतःच्या घरी तयार केले पाहिजे कारण अनेक शेतकऱ्यांची बियाणामध्ये फसवणूक झाली असून अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी केली. रोप तयार करण्यापासून ते विक्री पर्यंत कांद्याला साधारण वीस रुपये प्रतिकिलो मागे खर्च येत असतो. परंतु कांद्याला हवे तसे बाजारभाव मिळत नाही. याविरुद्ध सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा दर वाढीकरता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पाठीशी एकजुटीने उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल घेतली नाही. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणे करता संघटना एकजुटीने लढा देईल असे आश्वासन दिघोळे यांनी उपस्थितांना दिले.मेळाव्यात सुनील बारकू ठोक यांची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानिमित्त दिघोळे यांच्या हस्ते ठोक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कैलास ठोक, राजेंद्र कोकाटे, गिरीश ठोक, गोरख कोकाटे, रवी ठोक, लक्ष्मण कोकाटे, बाबुराव ठोक, गोपाळ ठोक, किरण ठोक, गणेश कोकाटे, दीपक खुळे, गणेश ठोक, योगेश ठोक, सोमनाथ कोकाटे, किशोर ठोक, उमेश खुळे, सुरेश खुळे, संजय खुळे, कृष्णा खुळे, केशव भोकनळ, ज्ञानेश्वर भोकनळ व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.कांद्याचे शास्त्र समजून घ्यावेकांदा पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे व त्याची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे.कांदा चाळीत जास्तीत जास्त टिकेल यासाठी त्याच्या साठवणुकीचे तंत्र शिकून शेतकऱ्यांनी कांद्याचे व्यवस्थापन करावे.-अशोक खुळे, तालुका अध्यक्ष कांदा उत्पादक युवा संघटना

 कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने सुनील ठोक यांचा सत्कार करताना भारत दिघोळे. समवेत रंगनाथ कोकाटे व अशोक खुळे. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरFarmerशेतकरी