शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वाङ्मयीन विचारमंथन होण्यासाठी संमेलनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:13 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही,

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही, असे म्हटले जाते़ तरीही काही प्रमाणात आशादायक चित्र आहे असे म्हणता येईल, कारण वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन पुस्तके निघत आहेत़ विशेषत: बालसाहित्य विषयावर वेगवेगळे कवी आणि लेखक लेखन करीत आहेत़ छोट्या-मोठ्या शहरांमधून वेगवेगळ्या पुस्तकांची प्रदर्शने लागलेली दिसतात़ यात तरुण वर्ग, महिला आणि बालवाचक यांच्या अभिरुचीच्या पुस्तकांना मागणी वाढली पाहिजे़ वाङ्मयीन विचारांचे आदान-प्रदान घडले पाहिजे़ विचारमंथन व्हायला पाहिजे यासाठीच नाशिकला संमेलन व्हावे़आजच्या काळात ग्रामीण, आदिवासी, पुरोगामी, युवक आणि बालसाहित्य संमेलने छोट्या-मोठ्या शहरात होत असतात़ परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे साहित्य क्षेत्रात मोठे मंथन घडून येते़ त्यामुळे आजच्या काळात लेखक, कवी आणि वाचक यांना काहीशी निराशाजनक वाटणारी परिस्थिती बदलण्यासाठी साहित्य संमेलन निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते़ नाशिकला यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने झालेली आहेत़ त्यामुळे साहित्य चळवळीवर त्या-त्या काळात थोडाफार परिणाम झालेला आहे़ यासाठी कायमस्वरूपी साहित्य क्षेत्रात मोठे कार्य होण्यासाठी नाशिक शहरात आगामी काळात मोठेसाहित्य संमेलन होण्याची गरज आहे़ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रूपाने ही संधी नाशिकला मिळू शकते़ यासाठी नाशिकने उत्तर महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीचे नेतृत्व केले पाहीजे, तरच या परिसरातील साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने व्यापक होऊन तिला चांगला आकार प्राप्त होऊ शकेल, अशी खात्री वाटते़- उत्तम कोळगावकरसाहित्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होतात़ पुस्तकांचे स्टॉल लागतात़ या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतात़ मराठी माणसांनी मराठी भाषेतली वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचली पाहिजेत, यासाठी लेखक-पुस्तक-वाचक मेळाव्यासारखे उपक्रम राबविले पाहिजेत़ वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य संमेलनांकडूनदेखील साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा घडून येते. या चर्चांमधून समाजाला एकप्रकारे विधायक दिशा मिळू शकते.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक