शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वाङ्मयीन विचारमंथन होण्यासाठी संमेलनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:13 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही,

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही, असे म्हटले जाते़ तरीही काही प्रमाणात आशादायक चित्र आहे असे म्हणता येईल, कारण वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन पुस्तके निघत आहेत़ विशेषत: बालसाहित्य विषयावर वेगवेगळे कवी आणि लेखक लेखन करीत आहेत़ छोट्या-मोठ्या शहरांमधून वेगवेगळ्या पुस्तकांची प्रदर्शने लागलेली दिसतात़ यात तरुण वर्ग, महिला आणि बालवाचक यांच्या अभिरुचीच्या पुस्तकांना मागणी वाढली पाहिजे़ वाङ्मयीन विचारांचे आदान-प्रदान घडले पाहिजे़ विचारमंथन व्हायला पाहिजे यासाठीच नाशिकला संमेलन व्हावे़आजच्या काळात ग्रामीण, आदिवासी, पुरोगामी, युवक आणि बालसाहित्य संमेलने छोट्या-मोठ्या शहरात होत असतात़ परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे साहित्य क्षेत्रात मोठे मंथन घडून येते़ त्यामुळे आजच्या काळात लेखक, कवी आणि वाचक यांना काहीशी निराशाजनक वाटणारी परिस्थिती बदलण्यासाठी साहित्य संमेलन निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते़ नाशिकला यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने झालेली आहेत़ त्यामुळे साहित्य चळवळीवर त्या-त्या काळात थोडाफार परिणाम झालेला आहे़ यासाठी कायमस्वरूपी साहित्य क्षेत्रात मोठे कार्य होण्यासाठी नाशिक शहरात आगामी काळात मोठेसाहित्य संमेलन होण्याची गरज आहे़ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रूपाने ही संधी नाशिकला मिळू शकते़ यासाठी नाशिकने उत्तर महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीचे नेतृत्व केले पाहीजे, तरच या परिसरातील साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने व्यापक होऊन तिला चांगला आकार प्राप्त होऊ शकेल, अशी खात्री वाटते़- उत्तम कोळगावकरसाहित्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होतात़ पुस्तकांचे स्टॉल लागतात़ या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतात़ मराठी माणसांनी मराठी भाषेतली वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचली पाहिजेत, यासाठी लेखक-पुस्तक-वाचक मेळाव्यासारखे उपक्रम राबविले पाहिजेत़ वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य संमेलनांकडूनदेखील साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा घडून येते. या चर्चांमधून समाजाला एकप्रकारे विधायक दिशा मिळू शकते.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक