शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी भोजापूरचे आवर्तन सोडण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:54 IST

भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकºयापर्यंत पाणी पोहच करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी व पाटबंधारे विभागाने समन्वयातून आवर्तन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले.

सिन्नर : भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकºयापर्यंत पाणी पोहच करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी व पाटबंधारे विभागाने समन्वयातून आवर्तन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले.येथील कडवा शासकीय विश्रामगृहात भोजपूर कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाºया आवर्तनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता एस. एस. गोंदकर, शाखा अभियंता बी. के. अचाट, बी. डब्ल्यू बोडके, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, दीपक बर्के, उपअभियंता सी. एम. आव्हाड, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी गणपत केदार, कारभारी आव्हाड, भागवत घुगे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  गळती, बाष्पीभवन याचा विचार करता रब्बीसाठी १५०, तर पिण्यासाठी प्रवाही ५० असे एकूण २०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिली. डाव्या कालव्यावरील शेवटच्या दोडीला शेवटच्या टोकापासून तर उजव्या कालव्यावरील पिंपळे येथून पाणी देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. धरणाच्या साठवणक्षेत्राची मोजणी करण्याचे ठरले असतानाही कोणतेही सर्वेक्षण झाले नाही. पाणी वापर संस्था पैसे देण्यास तयार असूनही पाटबंधारे विभागाने प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार शेतकºयांनी यावेळी केली. त्यावर शिंदे यांनी ७ लाख रुपये भरून पाटबंधारे विभाग मोजणी करणार असल्याचे आश्वासन दिले.  पाणी आरक्षण करताना पाणी वापर संस्थांना विश्वासात घेतले जात नाही. कालवा दुरु स्तीची कामे संथ गतीने सुरु आहेत. कालव्याचे पाणी मोजण्यासाठी कोणतीची यंत्रणा अस्तित्वात नाही. कालव्याला बोगदे पाडून होणाºया पाणीचोरीचे व्हीडीओ, छायाचित्र देऊनही संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली. यावेळी गणपत केदार, भागवत घुगे, अनिल सांगळे, नीलेश केदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते. ११० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण धरणात सध्या ३४३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून, पिण्यासाठी ११० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दिली. पिण्याच्या पाण्यासह २०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गळतीसह पाणीचोरीबाबत शेतकºयांनी तक्रारी केल्या. पाणी चोरी करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी दिले. गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी येत्या आठ दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.