शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी भोजापूरचे आवर्तन सोडण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:54 IST

भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकºयापर्यंत पाणी पोहच करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी व पाटबंधारे विभागाने समन्वयातून आवर्तन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले.

सिन्नर : भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकºयापर्यंत पाणी पोहच करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी व पाटबंधारे विभागाने समन्वयातून आवर्तन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले.येथील कडवा शासकीय विश्रामगृहात भोजपूर कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाºया आवर्तनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता एस. एस. गोंदकर, शाखा अभियंता बी. के. अचाट, बी. डब्ल्यू बोडके, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, दीपक बर्के, उपअभियंता सी. एम. आव्हाड, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी गणपत केदार, कारभारी आव्हाड, भागवत घुगे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  गळती, बाष्पीभवन याचा विचार करता रब्बीसाठी १५०, तर पिण्यासाठी प्रवाही ५० असे एकूण २०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिली. डाव्या कालव्यावरील शेवटच्या दोडीला शेवटच्या टोकापासून तर उजव्या कालव्यावरील पिंपळे येथून पाणी देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. धरणाच्या साठवणक्षेत्राची मोजणी करण्याचे ठरले असतानाही कोणतेही सर्वेक्षण झाले नाही. पाणी वापर संस्था पैसे देण्यास तयार असूनही पाटबंधारे विभागाने प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार शेतकºयांनी यावेळी केली. त्यावर शिंदे यांनी ७ लाख रुपये भरून पाटबंधारे विभाग मोजणी करणार असल्याचे आश्वासन दिले.  पाणी आरक्षण करताना पाणी वापर संस्थांना विश्वासात घेतले जात नाही. कालवा दुरु स्तीची कामे संथ गतीने सुरु आहेत. कालव्याचे पाणी मोजण्यासाठी कोणतीची यंत्रणा अस्तित्वात नाही. कालव्याला बोगदे पाडून होणाºया पाणीचोरीचे व्हीडीओ, छायाचित्र देऊनही संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली. यावेळी गणपत केदार, भागवत घुगे, अनिल सांगळे, नीलेश केदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते. ११० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण धरणात सध्या ३४३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून, पिण्यासाठी ११० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दिली. पिण्याच्या पाण्यासह २०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गळतीसह पाणीचोरीबाबत शेतकºयांनी तक्रारी केल्या. पाणी चोरी करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी दिले. गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी येत्या आठ दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.