शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

म्हाळोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोडी येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 16:20 IST

नांदूरशिंगोटे : श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. जुन्या रुढी, परंपरा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यादृष्टीने येथील यात्रा समितीने प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देयात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने पंचायत समिती स्तरावरून यात्रा काळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

नांदूरशिंगोटे : श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. जुन्या रुढी, परंपरा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यादृष्टीने येथील यात्रा समितीने प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री म्हाळोबा महाराज यात्रेस माघ पौर्णिमेस प्रारंभ होणार असल्याने यात्रा नियोजनाच्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी मार्गदर्शन केले.. व्यासपीठावर पोलीसपाटील सुदाम आव्हाड, कारभारी शिंदे, मारुती शिंदे, प्रकाश उंबरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यात्रा समितीने ग्रामीण रुग्णालय, वीज वितरण कंपनी, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना प्रशासकीय उपाययोजनेच्या दृष्टीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बैठकीस पाराजी शिंदे, जानकू शिंदे, कारभारी शिंदे, बापू शिंदे, सुभाष शिंदे, माधव शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब शिंदे, भीमा शिंदे, रायभान शिंदे, लक्ष्मण शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.चौकट - बारा जणांची समितीम्हाळोबा मंदिरासह यात्रा भरविण्यात येते ती जागा खासगी मालकीची आहे. गावातील धनगर समाजबांधवांकडे मंदिराची व्यवस्था आहे. सध्या म्हाळोबा मंदिराच्या जागेवरून व यात्रा काळात मंदिराला मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरून दोन गटात वाद सुरू आहेत. सदर वादाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांची बैठक घेऊन सर्वानुमते १२ लोकांची यात्रा समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर यात्रा काळात जमिनीचे वाद दूर ठेवून यात्रा शांततेत पार पाडावी याबाबत बोरसे यांनी लोकांना आवाहन केले.चौकट - यात्राकाळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी.म्हाळोबा महाराज नवसाला पावणारे महाराज मानले जात असल्याने यात्रा काळात येथे मोठी गर्दी होते. यात्रा काळात सदरच्या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. म्हाळोबा महाराज यात्रोत्सव १७ ते २० फेब्रुवारी या काळात होणार आहे. दोडी बुद्रुक ते म्हाळोबा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे या खड्ड्यांची संबंधित विभागाने यात्रेपूर्वी दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवणार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरींना मुबलक पाणी नाही. यात्रा काळात भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने ३ दिवस दररोज ५ खेपांद्वारे पाणीपुरवठा करावा. रस्त्याची दुरुस्ती व पाण्याचे टॅँकर सुरू करण्यासंदर्भात सरपंच मीना आव्हाड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.