शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

म्हाळोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोडी येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 16:20 IST

नांदूरशिंगोटे : श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. जुन्या रुढी, परंपरा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यादृष्टीने येथील यात्रा समितीने प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देयात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने पंचायत समिती स्तरावरून यात्रा काळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

नांदूरशिंगोटे : श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. जुन्या रुढी, परंपरा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यादृष्टीने येथील यात्रा समितीने प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री म्हाळोबा महाराज यात्रेस माघ पौर्णिमेस प्रारंभ होणार असल्याने यात्रा नियोजनाच्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी मार्गदर्शन केले.. व्यासपीठावर पोलीसपाटील सुदाम आव्हाड, कारभारी शिंदे, मारुती शिंदे, प्रकाश उंबरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यात्रा समितीने ग्रामीण रुग्णालय, वीज वितरण कंपनी, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना प्रशासकीय उपाययोजनेच्या दृष्टीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बैठकीस पाराजी शिंदे, जानकू शिंदे, कारभारी शिंदे, बापू शिंदे, सुभाष शिंदे, माधव शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब शिंदे, भीमा शिंदे, रायभान शिंदे, लक्ष्मण शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.चौकट - बारा जणांची समितीम्हाळोबा मंदिरासह यात्रा भरविण्यात येते ती जागा खासगी मालकीची आहे. गावातील धनगर समाजबांधवांकडे मंदिराची व्यवस्था आहे. सध्या म्हाळोबा मंदिराच्या जागेवरून व यात्रा काळात मंदिराला मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरून दोन गटात वाद सुरू आहेत. सदर वादाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांची बैठक घेऊन सर्वानुमते १२ लोकांची यात्रा समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर यात्रा काळात जमिनीचे वाद दूर ठेवून यात्रा शांततेत पार पाडावी याबाबत बोरसे यांनी लोकांना आवाहन केले.चौकट - यात्राकाळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी.म्हाळोबा महाराज नवसाला पावणारे महाराज मानले जात असल्याने यात्रा काळात येथे मोठी गर्दी होते. यात्रा काळात सदरच्या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. म्हाळोबा महाराज यात्रोत्सव १७ ते २० फेब्रुवारी या काळात होणार आहे. दोडी बुद्रुक ते म्हाळोबा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे या खड्ड्यांची संबंधित विभागाने यात्रेपूर्वी दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवणार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरींना मुबलक पाणी नाही. यात्रा काळात भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने ३ दिवस दररोज ५ खेपांद्वारे पाणीपुरवठा करावा. रस्त्याची दुरुस्ती व पाण्याचे टॅँकर सुरू करण्यासंदर्भात सरपंच मीना आव्हाड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.