शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

एमबीबीएसचा ‘तो’ पेपर ५ रोजी

By admin | Updated: December 2, 2014 00:51 IST

एमबीबीएसचा ‘तो’ पेपर ५ रोजी

  नाशिक (प्रतिनिधी)- एमबीबीएस तृतीय वर्षाच्या ईएनटी विषयाचा पेपरफुटीची दखल घेत विद्यापीठाने सदर परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला असून, सदर विषयाची परीक्षा येत्या ५ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली. लातूर येथील पेपरफुटीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. विद्यापीठाने तातडीने परीक्षा मंडळाची बैठक बोलावून याबाबत चर्चा केली होती. तसेच संबंधित केंद्राला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. याप्रकरणी विद्यापीठाने अज्ञाताविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सायबर क्राइमकडे सोपवावा, अशी मागणीदेखील केली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने व्हॉटस् अपवरील ‘ते’ प्रश्नदेखील हस्तगत केली असून, सदर माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान, फेर परीक्षेच्या नियोजनाबाबत संबंधित विषयांच्या परीक्षार्थींना माहिती देण्यात यावी, असे आवाहन विद्यापीठाने महाविद्यालयांना केले आहे. सदर विषयाच्या फेर परीक्षेच्या नियोजनानुसार दि. ५ रोजी दुपारी २.३० ते ४.३० यावेळेत सदर पेपर्स घेतले जाणार आहेत. दिलेल्या प्रवेशपत्रावरच विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीच्या केंद्रावरच होणार आहे.