शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

एमबीए प्रवेश घोळाच्या विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:47 IST

डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच्या वतीने हुतात्मा स्मारकात आंदोलन करून प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीच जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.

नाशिक : डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच्या वतीने हुतात्मा स्मारकात आंदोलन करून प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीच जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.एमबीएसाठी १० मार्चला सीईटी परीक्षा घेऊन ३१ मार्चला निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर ७ जूनला सेतूतील ‘सार’ पोर्टलच्या सहाय्याने कौन्सिलिंगला प्रारंभ झाला. मात्र, सर्व्हर सतत डाउन होत असल्याने नोंदणी करण्यात अनेक अडथळे आले. प्रक्रिया रद्द होऊनही नोंदणीसाठी घेतलेले शुल्क परत केले नाही. तसेच एमबीए प्रवेशासाठी यापूर्वी राज्यातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के, तर देशभरातील अन्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना १५ टक्के जागा आरक्षित होत्या. मात्र यंदा त्यात बदल करून राज्यातील विद्यापीठांच्या १५ टक्के जागा कमी करून बाहेरील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवत मुंबई न्यायायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने २६ जुलै रोजी निकाल देत पूर्वीच्या आरक्षणानुसारच प्रवेश देण्याचे आदेश दिले. मात्र तोपर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश झाले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर एमबीएचे प्रवेश स्थगित करण्यात आले.तातडीने लक्ष देण्याची मागणीएमबीएची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स प्रदर्शित केली असून, त्यात जेबीआयएमएस कॉलेजला डीटीईने स्वायत्त नसल्याचे मानले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी