शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

एमबीए प्रवेश घोळाच्या विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:47 IST

डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच्या वतीने हुतात्मा स्मारकात आंदोलन करून प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीच जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.

नाशिक : डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच्या वतीने हुतात्मा स्मारकात आंदोलन करून प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीच जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.एमबीएसाठी १० मार्चला सीईटी परीक्षा घेऊन ३१ मार्चला निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर ७ जूनला सेतूतील ‘सार’ पोर्टलच्या सहाय्याने कौन्सिलिंगला प्रारंभ झाला. मात्र, सर्व्हर सतत डाउन होत असल्याने नोंदणी करण्यात अनेक अडथळे आले. प्रक्रिया रद्द होऊनही नोंदणीसाठी घेतलेले शुल्क परत केले नाही. तसेच एमबीए प्रवेशासाठी यापूर्वी राज्यातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के, तर देशभरातील अन्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना १५ टक्के जागा आरक्षित होत्या. मात्र यंदा त्यात बदल करून राज्यातील विद्यापीठांच्या १५ टक्के जागा कमी करून बाहेरील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवत मुंबई न्यायायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने २६ जुलै रोजी निकाल देत पूर्वीच्या आरक्षणानुसारच प्रवेश देण्याचे आदेश दिले. मात्र तोपर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश झाले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर एमबीएचे प्रवेश स्थगित करण्यात आले.तातडीने लक्ष देण्याची मागणीएमबीएची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स प्रदर्शित केली असून, त्यात जेबीआयएमएस कॉलेजला डीटीईने स्वायत्त नसल्याचे मानले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी