शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

महापौरांच्या बैठका खूप झाल्या, आता ठोस कारवाईची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:43 IST

नाशिक : कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्यासाठी आता केवळ बैठकाच नव्हे तर कृतीची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक मनपात वातावरण बदलले पाहिजेअधिक आक्रमक, गतिमान कारभाराची गरज

संजय पाठक, नाशिक: कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्यासाठी आता केवळ बैठकाच नव्हे तर कृतीची गरज निर्माण झाली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी गेली तीन वर्षे अंतर्गत संघर्षातच गेले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे आपसातील वाद आणि नऊ महिने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षातच गेले. मुंढे यांची बदली आणि आता तरी कामे होतील अशी अपेक्षा होती, परंतु महापौर रंजना भानसी यांना पद सोडण्याचे वेध लागले. त्यातच त्या भाजपचे श्रेष्ठी नाराज असलेल्या तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक. विधानसभा निवडणुकीत सानप यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज गटात भानसी यांचे नावही समाविष्ट होते. दरम्यान, त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील बागुल यांनीच गेल्या तीन वर्षांत नगरसेवकांची कामे झाली नाही, अशी जाहीर वाच्यता करून नगरसेवकांच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. राज्यात सत्ता गेली तरी नाशिकमध्ये महापौरपद भाजपकडेच राहिले. पक्षातील आयारामांनी पक्ष नेत्यांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीसाठी वेगवेगळे स्पिरीट जागृत झाले. परंतु त्यानंतरही सतीश कुलकर्णी महापौरपदी आणि उपमहापौरपदी भिकुबाई बागुल विराजमान झाल्या.

महापौरपद स्वीकारल्यानंतर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या महिन्यातील पहिलीच सभा गाजवली. त्यामुळे त्यांच्याविषयी अपेक्षा निर्माण झाल्या. महापालिका मोजकेच नगरसेवक चालवतात आणि त्यांच्याच प्रभागात कामे होतात, ही ओरड आहे. त्यातच भाजपचे मोजकेच नगरसेवक जुने असून बहुतांशी प्रथमच निवडून आले आहेत. त्यांच्या महापौरांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांत मोजक्या लोकांनी महापालिका हाताळली आणि सामान्य नगरसेवकांकडे दुर्लक्ष केले. आता याच नगरसेवकांची कामे प्राधान्याने कशी होतील, हेच महापौरांनी बघितले पाहिजे. महापौरांनी आपल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बैठकांचे सत्र राबविले आणि छोट्या छोट्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. त्यात गैर नाही, मात्र नगरसेवक स्तरावरील कामे किंवा प्रभाग समित्यांच्या स्तरावरील कामे त्यांनाच करू दिली तर महापौर कुलकर्णी यांना शहर स्तरावरील विषयांकडे लक्ष पुरवता येईल.

महापौर कुलकर्णी यांची पदे त्यादृष्टीने पडत असली तरी यासंदर्भात जरा आक्रमक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. निर्ढावलेले प्रशासन आणि सौम्य स्वभावाचे महापौर हे अत्यंत विसंगत चित्र दिसू शकेल. राज्यात सत्ता असताना भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी महापालिकेत फिरकत, परंतु आत्ता राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर कोणी लक्ष घालायला तयार नाही. महापालिकेच्या प्रकल्पांविषयी सत्ताधारी उलटसुलट चर्चा करीत असताना त्यावरदेखील भाजपचे पदाधिकारी उत्तर देण्यास तयार नाहीत. अशा वातावरणात आगामी दोन वर्षांत शहर हिताचे आणि वेगळे ठोस निर्णय घ्यायचे असतील तर त्यादृष्टीने आक्रमक भूमिका घेताना कामाचा उरक वाढायला हवा, तरच सत्ता राखण्याचा खरा उद्देश सार्थ ठरेल.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरBJPभाजपा