शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

महापौरांच्या बैठका खूप झाल्या, आता ठोस कारवाईची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:43 IST

नाशिक : कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्यासाठी आता केवळ बैठकाच नव्हे तर कृतीची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक मनपात वातावरण बदलले पाहिजेअधिक आक्रमक, गतिमान कारभाराची गरज

संजय पाठक, नाशिक: कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्यासाठी आता केवळ बैठकाच नव्हे तर कृतीची गरज निर्माण झाली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी गेली तीन वर्षे अंतर्गत संघर्षातच गेले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे आपसातील वाद आणि नऊ महिने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षातच गेले. मुंढे यांची बदली आणि आता तरी कामे होतील अशी अपेक्षा होती, परंतु महापौर रंजना भानसी यांना पद सोडण्याचे वेध लागले. त्यातच त्या भाजपचे श्रेष्ठी नाराज असलेल्या तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक. विधानसभा निवडणुकीत सानप यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज गटात भानसी यांचे नावही समाविष्ट होते. दरम्यान, त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील बागुल यांनीच गेल्या तीन वर्षांत नगरसेवकांची कामे झाली नाही, अशी जाहीर वाच्यता करून नगरसेवकांच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. राज्यात सत्ता गेली तरी नाशिकमध्ये महापौरपद भाजपकडेच राहिले. पक्षातील आयारामांनी पक्ष नेत्यांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीसाठी वेगवेगळे स्पिरीट जागृत झाले. परंतु त्यानंतरही सतीश कुलकर्णी महापौरपदी आणि उपमहापौरपदी भिकुबाई बागुल विराजमान झाल्या.

महापौरपद स्वीकारल्यानंतर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या महिन्यातील पहिलीच सभा गाजवली. त्यामुळे त्यांच्याविषयी अपेक्षा निर्माण झाल्या. महापालिका मोजकेच नगरसेवक चालवतात आणि त्यांच्याच प्रभागात कामे होतात, ही ओरड आहे. त्यातच भाजपचे मोजकेच नगरसेवक जुने असून बहुतांशी प्रथमच निवडून आले आहेत. त्यांच्या महापौरांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांत मोजक्या लोकांनी महापालिका हाताळली आणि सामान्य नगरसेवकांकडे दुर्लक्ष केले. आता याच नगरसेवकांची कामे प्राधान्याने कशी होतील, हेच महापौरांनी बघितले पाहिजे. महापौरांनी आपल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बैठकांचे सत्र राबविले आणि छोट्या छोट्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. त्यात गैर नाही, मात्र नगरसेवक स्तरावरील कामे किंवा प्रभाग समित्यांच्या स्तरावरील कामे त्यांनाच करू दिली तर महापौर कुलकर्णी यांना शहर स्तरावरील विषयांकडे लक्ष पुरवता येईल.

महापौर कुलकर्णी यांची पदे त्यादृष्टीने पडत असली तरी यासंदर्भात जरा आक्रमक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. निर्ढावलेले प्रशासन आणि सौम्य स्वभावाचे महापौर हे अत्यंत विसंगत चित्र दिसू शकेल. राज्यात सत्ता असताना भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी महापालिकेत फिरकत, परंतु आत्ता राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर कोणी लक्ष घालायला तयार नाही. महापालिकेच्या प्रकल्पांविषयी सत्ताधारी उलटसुलट चर्चा करीत असताना त्यावरदेखील भाजपचे पदाधिकारी उत्तर देण्यास तयार नाहीत. अशा वातावरणात आगामी दोन वर्षांत शहर हिताचे आणि वेगळे ठोस निर्णय घ्यायचे असतील तर त्यादृष्टीने आक्रमक भूमिका घेताना कामाचा उरक वाढायला हवा, तरच सत्ता राखण्याचा खरा उद्देश सार्थ ठरेल.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरBJPभाजपा