शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

महापौरांच्या बैठका खूप झाल्या, आता ठोस कारवाईची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:43 IST

नाशिक : कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्यासाठी आता केवळ बैठकाच नव्हे तर कृतीची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक मनपात वातावरण बदलले पाहिजेअधिक आक्रमक, गतिमान कारभाराची गरज

संजय पाठक, नाशिक: कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्यासाठी आता केवळ बैठकाच नव्हे तर कृतीची गरज निर्माण झाली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी गेली तीन वर्षे अंतर्गत संघर्षातच गेले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे आपसातील वाद आणि नऊ महिने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षातच गेले. मुंढे यांची बदली आणि आता तरी कामे होतील अशी अपेक्षा होती, परंतु महापौर रंजना भानसी यांना पद सोडण्याचे वेध लागले. त्यातच त्या भाजपचे श्रेष्ठी नाराज असलेल्या तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक. विधानसभा निवडणुकीत सानप यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज गटात भानसी यांचे नावही समाविष्ट होते. दरम्यान, त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील बागुल यांनीच गेल्या तीन वर्षांत नगरसेवकांची कामे झाली नाही, अशी जाहीर वाच्यता करून नगरसेवकांच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. राज्यात सत्ता गेली तरी नाशिकमध्ये महापौरपद भाजपकडेच राहिले. पक्षातील आयारामांनी पक्ष नेत्यांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीसाठी वेगवेगळे स्पिरीट जागृत झाले. परंतु त्यानंतरही सतीश कुलकर्णी महापौरपदी आणि उपमहापौरपदी भिकुबाई बागुल विराजमान झाल्या.

महापौरपद स्वीकारल्यानंतर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या महिन्यातील पहिलीच सभा गाजवली. त्यामुळे त्यांच्याविषयी अपेक्षा निर्माण झाल्या. महापालिका मोजकेच नगरसेवक चालवतात आणि त्यांच्याच प्रभागात कामे होतात, ही ओरड आहे. त्यातच भाजपचे मोजकेच नगरसेवक जुने असून बहुतांशी प्रथमच निवडून आले आहेत. त्यांच्या महापौरांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांत मोजक्या लोकांनी महापालिका हाताळली आणि सामान्य नगरसेवकांकडे दुर्लक्ष केले. आता याच नगरसेवकांची कामे प्राधान्याने कशी होतील, हेच महापौरांनी बघितले पाहिजे. महापौरांनी आपल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बैठकांचे सत्र राबविले आणि छोट्या छोट्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. त्यात गैर नाही, मात्र नगरसेवक स्तरावरील कामे किंवा प्रभाग समित्यांच्या स्तरावरील कामे त्यांनाच करू दिली तर महापौर कुलकर्णी यांना शहर स्तरावरील विषयांकडे लक्ष पुरवता येईल.

महापौर कुलकर्णी यांची पदे त्यादृष्टीने पडत असली तरी यासंदर्भात जरा आक्रमक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. निर्ढावलेले प्रशासन आणि सौम्य स्वभावाचे महापौर हे अत्यंत विसंगत चित्र दिसू शकेल. राज्यात सत्ता असताना भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी महापालिकेत फिरकत, परंतु आत्ता राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर कोणी लक्ष घालायला तयार नाही. महापालिकेच्या प्रकल्पांविषयी सत्ताधारी उलटसुलट चर्चा करीत असताना त्यावरदेखील भाजपचे पदाधिकारी उत्तर देण्यास तयार नाहीत. अशा वातावरणात आगामी दोन वर्षांत शहर हिताचे आणि वेगळे ठोस निर्णय घ्यायचे असतील तर त्यादृष्टीने आक्रमक भूमिका घेताना कामाचा उरक वाढायला हवा, तरच सत्ता राखण्याचा खरा उद्देश सार्थ ठरेल.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरBJPभाजपा