शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

कमाल तपमान घसरले; वाºयाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:55 IST

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळामुळे वाढलेल्या वाºयाच्या वेगाने दिवसभर गारठा जाणवत होता. शहरात दिवसभर ताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देकमाल तपमान घसरले; वाºयाचा वेग वाढलाताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले.एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळामुळे वाढलेल्या वाºयाच्या वेगाने दिवसभर गारठा जाणवत होता. शहरात दिवसभर ताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद करण्यात आली.‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला. उत्तर महाराष्टÑातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून, मासेमारी करणाºयांनादेखील समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या थंडीबरोबरच रिमझिम पावसामुळे गारवा वाढल्याने नेहमीच गजबजणाºया रस्त्यावर आणि बाजारात वर्दळ कमी झाली होती. तर ठिकठिकाणी दिवसभर शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले.दिवसाही वाहनांचेदिवे सुरू दुचाकी-चारचाकी वाहनचालकांनी रिमझिम पाऊस, ढगाळ हवामानामुळे रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना वाहनाचे मुख्य दिव्यांसह ‘पार्किंग इंडिकेटर’ सुरू करण्याची खबरदारी प्रवासादरम्यान घेतल्याचे दिसून आले. दाट ढगाळ हवामानामुळे दिवसभर अंधूक प्रकाश व रिमझिम पावसामुळे रस्ता दिसेनासा झाला होता. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू करून बहुसंख्य वाहनचालकांनी वाहतूक करणे पसंत केले.