शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

मॅट’ने दणका दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:46 IST

२० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच महसूल मंत्रालयातील अधिका-यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला

ठळक मुद्देउपरती : महसूल मंत्रालयाने आपलेच निर्णय फिरविले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निवडणूक आयोगाने निवडणुकीचे काम पाहणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या नियम, निकषानुसार बदल्या करण्याचे आदेश दिलेले असताना त्यांच्या विपर्यास अर्थ काढून सोयीने बदल्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविणारे विभागीय आयुक्त कार्यालय व महसूल मंत्रालयाला महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने सणसणीत चपराक लगावताच, बुधवारी महसूल खात्याने जवळपास सात तहसीलदार व पाच उपजिल्हाधिका-यांचे नव्याने नियुक्तीचे आदेश काढले असून, त्यात काही अधिकाºयांची प्रशासकीय कारणास्तवही बदली करण्यात आली आहे.

मॅटने दणका दिल्यानंतर बदली करण्यात आलेल्या अधिकाºयांमध्ये तहसीलदार स्वप्नील पवार (बीड), जे. डी. वळवी (बीड), डी. सी. मेंडके (जालना), गणेश राठोड (धुळे), आबा महाजन (धुळे), वैशाली हिंगे (जळगाव) व मिलिंद कुलकर्णी (जळगाव) यांचा समावेश आहे, तर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी (जालना), लतीफ पठाण (नांदेड), सुनील यादव (लातूर) व ब्रिजेश पाटील (जालना) या चौघांचा समावेश आहे, तर जिल्हाधिकारी व निवडणूक अधिका-यांच्या प्रस्तावानेदेखील निवडणुकीच्या सोयीसाठी काही अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात जालनाचे श्रीमती संगीता सानप व राज नंदकर या दोघांचाही समावेश आहे. महसूल मंत्रालयाने या बदल्यांचे आदेश जारी केल्यानंतर विनाविलंब या अधिका-यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे तर संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांनी त्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. २० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच महसूल मंत्रालयातील अधिका-यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यासाठी अनेक अधिका-यांना ‘तडजोडी’साठी भाग पाडण्यात आले. त्यामुळे साहजिकच काही प्रामाणिक अधिकाºयांची गैरसोय झाल्यानंतर त्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटनेदेखील त्याची दखल घेत बाजू ऐकून घेण्याबरोबरच महसूल मंत्रालयाला गैरसोयीच्या व चुकीच्या बदल्या केल्याबद्दल धारेवर धरून ताश्ोरे ओढले होते. त्यामुळे अन्याय झालेल्या अधिका-यांच्या सोयीनुसार बदल्या करण्याचे आदेश महसूल खात्याला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी महसूल विभागाने या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिकElectionनिवडणूक