शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गढईपाडयावरील पोरांना मातृत्वाचा ओलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:52 IST

सामाजिक दायित्व : जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ठळक मुद्देपाडयावरच्या गृहिणींनी चुलीवर बनवलेल्या नागालीच्या भाकरी, ऊडदाचं बेसन, ठेचा, कांदा अशा अस्सल गावरानं मेनूचा आनंदाने स्विकार केला.

पेठ : नाशिकसारख्या शहरात वास्तव्यास राहून सर्व सुखसोयींनी युक्त जीवनाचा आनंद घेणाऱ्या भगिनींनी पेठ तालुक्यातील गढईपाडयावरील चिमुकल्यांच्या सहवासात आख्खा दिवस घालवला आणि टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांची पोरं काही काळ मायेच्या पंखाखाली आली.गढईपाडा या आदिवासी पाडयावरील सर्व पालक मजुरीसाठी इतरत्र स्थलांतरीत होत असतात. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारी मुले आजी- आजोबा किंवा आपल्या मोठया भाऊ बहिणींच्या सोबत राहतात. अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ज्ञानाचे धडे गिरवणा-या आदिवासी बालकांची गरज ओळखून नाशिक येथील सौ.किरण चांडक यांच्या संकल्पनेतून सौ. रोशनी राठी, शितल लढ्ढा, आरती, रमा, किरण आदी भागिनींनी गढईच्या ५४ मुलांसाठी शूज , सॉक्स, वॉटरबॅग, साबण, बिस्कीट, चॉकलेट आदी वस्तू आणल्या. पाडयावरच्या गृहिणींनी चुलीवर बनवलेल्या नागालीच्या भाकरी, ऊडदाचं बेसन, ठेचा, कांदा अशा अस्सल गावरानं मेनूचा आनंदाने स्विकार केला. एकमेकांचा निरोप घेतांना मुलांच्या चेह-यांवरील आनंद आणि भगिनींच्या डोळ्यांतील प्रेम दिसून येत होते. याप्रसंगी पेठचे गट शिक्षणाधिकारी संतोष झोले, मुख्याध्यापक आर.डी. शिंदे, शिक्षक मनोहर जाधव,गणू राऊत, तारा गोबाले, काशीबाई शिंगाडे यांचे सह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. मनोहर जाधव यांनी सूत्रसंचलन केले.

टॅग्स :Nashikनाशिक