शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मास्क ना सॅनिटायझर सेविका फिरताहेत रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 22:41 IST

नाशिक : एकात्मिक बालविकास विभागाप्रमाणे नाशिक महापालिकेनेही अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार म्हणजेच खाऊ वाटप सुरू केले आहे.

नाशिक : एकात्मिक बालविकास विभागाप्रमाणे नाशिक महापालिकेनेही अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार म्हणजेच खाऊ वाटप सुरू केले आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेचे आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आदेशानुसार वाटप करणाऱ्या सेविकांना मास्क किंवा तत्सम सुरक्षा साधनेच उपलब्ध करून दिली नसल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर त्यांना कोरोनाबाधित क्षेत्रातही घर सर्वेक्षणासाठी नेले जात असल्याने अत्यंत जोखमीने त्यांना काम करावे लागत आहे.गेल्या महिन्यात राज्यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाउन आणि संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या. अंगणवाड्यादेखील बंद करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात महापालिकेच्या सुमारे पावणेचारशे अंगणवाड्या आहेत. त्यात सुमारे दहा ते बारा हजार मुले आहेत. या अंगणवाड्याही गेल्या महिन्यात बंद करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने एकात्मिक बाल विकास विभागाला अंगणवाडीत येणाºया बालकांच्या घरपोच पोषण आहार पोहोचविण्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही २९ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहे. त्यानुसार एकदाच अंगणवाडीतील मुलांना गूळ, शेंगदाण्याचा लाडू, गूळ आणि शेंंगदाणे प्रत्येकी अडीचशे ग्रॅम, मटकी आणि मोडाची उसळ (शिजवलेली) तसेच अर्धा डझन केळी असा पोषण घरोघर पोहोचविण्याचे निर्देश आहे. संबंधित बचत गटाला ९० रुपयांचा हा खाऊ पोहोचवायचे आदेश असले तरी घरपोच सेवा देताना अंगणवाडी सेविकांनी मास्क, सॅनिटायझर, ग्लोज वापरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अशाप्रकारे कोणतेही सुरक्षित साधने देण्यात आालेली नाहीत महापालिकेच्या आंगणवाड्या सेविकांना अशाप्रकारची साधने देण्यात आली नाही आणि उलट सर्व महिलांनी ती स्वत:हून खरेदी करावीत असे मुख्य सेविका सांगत असल्याचे काही सेविकांनी सांगितले. महापालिकेच्या अंगणवाड्या बहुतांशी दाट वस्तीत आहे, अशावेळी पुरेशी सुरक्षित साधने नसताना घरपोच पोषण आहार वाटप करणे जिकिरीचे असल्याचे सेविकांनी सांगितले.-------महापालिकेच्या सर्व अंगणवाड्यांच्या सेविका पोषण आहार घरोघरी पोहोचवित आहेत. पोषण आहाराबरोबरच बाधित रुग्णाच्या घर सर्वेक्षणात त्यांच्याबरोबरच अन्य कर्मचारीसुद्धा जोखीम पत्करून असतात. सध्या आपत्तीच अशी आली आहे. पोषण आहार पुरविताना सुरक्षा साधने नसल्याबाबत प्रशासनाकडे कोणत्या प्रकारचे तक्रार आलेली नाही.- अर्चना तांबे, उपआयुक्त, समाजकल्याण विभाग

टॅग्स :Nashikनाशिक