शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
3
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
4
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
5
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
6
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
7
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
8
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
9
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
10
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
11
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
12
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
13
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
14
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
15
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
16
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
17
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
18
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
19
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
20
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...

बाजारभावाने टमाटे पिकाची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:52 IST

सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणारे टमाटे पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव कमी झाल्याने अगोदर पावसाने तर आत्ता बाजारभावाच्या कारणाने टमाटे उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागली असून ते चिंता ग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : हंगामाच्या सुरवातीलाच किमती घसरल्याने शेतकरी चिंता ग्रस्त

सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणारे टमाटे पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव कमी झाल्याने अगोदर पावसाने तर आत्ता बाजारभावाच्या कारणाने टमाटे उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागली असून ते चिंता ग्रस्त झाले आहेत.जून महिन्यात मृग नक्षत्र सुरु होताच नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे जूनच्या मध्यवर्ती आणि अखेरीस अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टमाटे पिकाची लागवड केली होती मशागत, मल्चिंग पेपर, रोप तार, बांबू यांचा एकरी किमान ७० ते ८० हजार रु पये खर्च करून शेतात उभ्या केलेल्या पिकाला जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका बसला.जुलै आणि आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडला. या दोन महिन्यात बुरशी, फळ, फुलकुज, डम्पिंग, करपा, व्हायरस अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. या काळात हजारो रु पयांची औषध फवारणी करावी लागली शिवाय अनेक शेतकºयांची हाती आलेली पिके वाया गेले. दरवर्षीच्या तुलनेत किमान २० हजार रु पये खर्च जास्त झाला त्यामुळे शेतकºयांच्या टमाटे पिकवितांना नाकी नऊ आले होते.टमाटे पीक बहुतांशी भागात जास्त प्रमाणात पाऊस पडला असल्याने बाजारभाव चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकºयांना होती अशी शक्यता जाणकरांकडून वर्तिवली जात होती, मात्र सर्व अपेक्षा फोल ठरल्या.हंगामाच्या सुरवातीला चारशे ते पाचशे रु पये क्र ेट भाव मिळाला होता. मात्र पंधरा ते वीस दिवसात बाजार भाव कोसळले आणि आज केवळ १०० ते २०० रु भाव वीस किलोच्या कॅरेटला मिळत आहे.पावसाने नुकसान होवून खूपच कमी फळ झाले असल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यात भाव कमी झाल्याने शेतकºयांना खर्च वसूल होतो की नाही अशी भिती आहे.दोन वर्षे सलग दुष्काळ होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यंदा चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे चार पैसे पदरात पडुन डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर कमी होईल अशी अपेक्षा शेतकºयांना होती, मात्र पाऊस आणि बाजारभाव यांच्या जाचक अटी मधेच आल्याने कर्ज आणखी वाढले आहे.निर्यात होत नसल्याने परिणामनाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक टमाटे पाकिस्तान या देशात दरवर्षी निर्यात व्हायचे त्यानंतर बांगला, काठमांडू या ठिकाणी निर्यात होतात यंदा भारत व पाकिस्तान देशातील अंतर्गत संबंध बिघडलेले असल्याने पाकिस्तानमध्ये टमाटे निर्यात होत नाही. त्याचा फटका बसला आहे.तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने टमाटे दर्जेदार नाही. गुणवत्ता ढासळली आहे. अनेक औषधांचे अति प्रमाणात वापर झाल्याने फळाची चकाकी कमी झाली आहे. त्यामुळे निर्यातक्षम टमाटे नसल्याने भाव कोसल्याचे व्यापाºयांकडून बोलले जात आहे.जून महिन्यात टमाटे पिकाची लागवड केली तर १५ आॅगस्ट दरम्यान टमाटे विक्र ीसाठी तयार होतात तेव्हा चांगला भाव मिळतो. यंदा मात्र हंगामाच्या सुरवातीलाच भाव कोसळले आहे. शिवाय जास्त प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे खर्च खूप झाला आहे. अशा भावात खर्च वसूल होणे अवघड आहे.- संदिप सातपुते, शेतकरी.