शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

बाजारभावाने टमाटे पिकाची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:52 IST

सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणारे टमाटे पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव कमी झाल्याने अगोदर पावसाने तर आत्ता बाजारभावाच्या कारणाने टमाटे उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागली असून ते चिंता ग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : हंगामाच्या सुरवातीलाच किमती घसरल्याने शेतकरी चिंता ग्रस्त

सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणारे टमाटे पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव कमी झाल्याने अगोदर पावसाने तर आत्ता बाजारभावाच्या कारणाने टमाटे उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागली असून ते चिंता ग्रस्त झाले आहेत.जून महिन्यात मृग नक्षत्र सुरु होताच नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे जूनच्या मध्यवर्ती आणि अखेरीस अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टमाटे पिकाची लागवड केली होती मशागत, मल्चिंग पेपर, रोप तार, बांबू यांचा एकरी किमान ७० ते ८० हजार रु पये खर्च करून शेतात उभ्या केलेल्या पिकाला जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका बसला.जुलै आणि आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडला. या दोन महिन्यात बुरशी, फळ, फुलकुज, डम्पिंग, करपा, व्हायरस अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. या काळात हजारो रु पयांची औषध फवारणी करावी लागली शिवाय अनेक शेतकºयांची हाती आलेली पिके वाया गेले. दरवर्षीच्या तुलनेत किमान २० हजार रु पये खर्च जास्त झाला त्यामुळे शेतकºयांच्या टमाटे पिकवितांना नाकी नऊ आले होते.टमाटे पीक बहुतांशी भागात जास्त प्रमाणात पाऊस पडला असल्याने बाजारभाव चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकºयांना होती अशी शक्यता जाणकरांकडून वर्तिवली जात होती, मात्र सर्व अपेक्षा फोल ठरल्या.हंगामाच्या सुरवातीला चारशे ते पाचशे रु पये क्र ेट भाव मिळाला होता. मात्र पंधरा ते वीस दिवसात बाजार भाव कोसळले आणि आज केवळ १०० ते २०० रु भाव वीस किलोच्या कॅरेटला मिळत आहे.पावसाने नुकसान होवून खूपच कमी फळ झाले असल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यात भाव कमी झाल्याने शेतकºयांना खर्च वसूल होतो की नाही अशी भिती आहे.दोन वर्षे सलग दुष्काळ होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यंदा चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे चार पैसे पदरात पडुन डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर कमी होईल अशी अपेक्षा शेतकºयांना होती, मात्र पाऊस आणि बाजारभाव यांच्या जाचक अटी मधेच आल्याने कर्ज आणखी वाढले आहे.निर्यात होत नसल्याने परिणामनाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक टमाटे पाकिस्तान या देशात दरवर्षी निर्यात व्हायचे त्यानंतर बांगला, काठमांडू या ठिकाणी निर्यात होतात यंदा भारत व पाकिस्तान देशातील अंतर्गत संबंध बिघडलेले असल्याने पाकिस्तानमध्ये टमाटे निर्यात होत नाही. त्याचा फटका बसला आहे.तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने टमाटे दर्जेदार नाही. गुणवत्ता ढासळली आहे. अनेक औषधांचे अति प्रमाणात वापर झाल्याने फळाची चकाकी कमी झाली आहे. त्यामुळे निर्यातक्षम टमाटे नसल्याने भाव कोसल्याचे व्यापाºयांकडून बोलले जात आहे.जून महिन्यात टमाटे पिकाची लागवड केली तर १५ आॅगस्ट दरम्यान टमाटे विक्र ीसाठी तयार होतात तेव्हा चांगला भाव मिळतो. यंदा मात्र हंगामाच्या सुरवातीलाच भाव कोसळले आहे. शिवाय जास्त प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे खर्च खूप झाला आहे. अशा भावात खर्च वसूल होणे अवघड आहे.- संदिप सातपुते, शेतकरी.