शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

राज्य सरकारकडून शिक्षणाचे बाजारीकरण :  कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:10 IST

राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले.

मालेगाव : राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले. येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात शिक्षक भारतीच्या वतीने नाशिक विभागीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते. शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, नाना बोरस्ते राज्याध्यक्ष नवनाथ गेंद, भरत शेलार, दिनेश खोसे, राजेंद्र लोंढे, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा आदी उपस्थित होते.  राज्यमंत्री भुसे म्हणाले, शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आमदार कपिल पाटील सभागृहात असावे, अशी सर्वांची भावना आहे. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत लवकरच शिक्षण सचिवांच्या समवेत बैठक लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी भरत शेलार यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्ताने नाशिक विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन के. के. अहिरे यांनी केले. मेळाव्यास शहर व तालुक्यासह धुळे, जळगाव, नगर येथील मोठ्या संख्येने प्राथमिक माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सध्याच्या राज्यकर्त्यांना कान राहिलेले नाहीत. त्यामुळे हे सरकार शिक्षकांच्या समस्यांबाबत काहीही ऐकायला तयार नाही. राज्यातील विद्यमान शाळा मोडून काढणे व शिक्षकांना बदनाम करणे हा उद्योग शिक्षणमंत्री तावडे करीत आहेत. स्वयंअर्थसाह्य शाळांचे विधेयक आणले असून, आपल्या शाळा बंद करून आता कंपन्याना शाळा काढण्यास सरकार परवानगी देते आहे़  -कपिल पाटील,आमदार

टॅग्स :GovernmentसरकारMLAआमदार