शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राज्य सरकारकडून शिक्षणाचे बाजारीकरण :  कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:10 IST

राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले.

मालेगाव : राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले. येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात शिक्षक भारतीच्या वतीने नाशिक विभागीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते. शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, नाना बोरस्ते राज्याध्यक्ष नवनाथ गेंद, भरत शेलार, दिनेश खोसे, राजेंद्र लोंढे, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा आदी उपस्थित होते.  राज्यमंत्री भुसे म्हणाले, शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आमदार कपिल पाटील सभागृहात असावे, अशी सर्वांची भावना आहे. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत लवकरच शिक्षण सचिवांच्या समवेत बैठक लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी भरत शेलार यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्ताने नाशिक विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन के. के. अहिरे यांनी केले. मेळाव्यास शहर व तालुक्यासह धुळे, जळगाव, नगर येथील मोठ्या संख्येने प्राथमिक माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सध्याच्या राज्यकर्त्यांना कान राहिलेले नाहीत. त्यामुळे हे सरकार शिक्षकांच्या समस्यांबाबत काहीही ऐकायला तयार नाही. राज्यातील विद्यमान शाळा मोडून काढणे व शिक्षकांना बदनाम करणे हा उद्योग शिक्षणमंत्री तावडे करीत आहेत. स्वयंअर्थसाह्य शाळांचे विधेयक आणले असून, आपल्या शाळा बंद करून आता कंपन्याना शाळा काढण्यास सरकार परवानगी देते आहे़  -कपिल पाटील,आमदार

टॅग्स :GovernmentसरकारMLAआमदार