शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

लिलावासाठी बाजार समित्या सज्ज

By admin | Updated: June 9, 2017 01:08 IST

२४७ ट्रक भाजीपाला रवाना : आज व्यवहार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवत, त्यांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीत विक्रीसाठी माल आणण्याची मुभा दिल्यामुळे व्यवहारासाठी बाजार समित्या सज्ज झाल्या असून, सुकाणू समितीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर दूध व भाजीपाल्याची वाहतूक सुरळीत होऊन २४७ ट्रक रवाना करण्यात आले आहेत.१ जूनपासून शेतकरी संपावर गेल्यामुळे जिल्ह्यातील सतरा बाजार समित्यांचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. शेतकऱ्यांच्या संपामुळे महाग झालेला भाजीपाला स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शुक्रवारपासून व्यवहार सुरू होणार आहेत. गुरुवारी यासंदर्भात घोषणा होताच, जिल्ह्णातून ६८ दुधाचे टॅँकर, ६३ ट्रक भाजीपाला, ८३ ट्रक कांदा व ३३ ट्रक अन्य माल रवाना करण्यात आला तसेच दुपारनंतर घोटी, नाशिक, नांदगाव, मनमाड, चांदवड या पाच बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांनी माल आणल्याने त्याचे लिलाव करण्यात आले. एका बाजार समितीत एका दिवसात ४० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने गेल्या आठ दिवसांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या शेतमालाचीही तोडणी न झाल्याने खराब होऊन नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीची अनुमती दिल्याने आता बाजार समितीत मालाची आवक होण्याची व लिलाव पार पडण्यास सुरुवात होणार आहे.