शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सात दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर बाजारपेठ गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:05 IST

सिन्नर : गेला संपूर्ण आठवडा जनता कर्फ्यूचे पालन केल्यानंतर मंगळवारपासून वावी गावातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवसायांची वेळ निश्चित केली असून, प्रत्येक शनिवारी सामूहिक सुटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिन्नर : गेला संपूर्ण आठवडा जनता कर्फ्यूचे पालन केल्यानंतर मंगळवारपासून वावी गावातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवसायांची वेळ निश्चित केली असून, प्रत्येक शनिवारी सामूहिक सुटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.तालुक्यातील मोठी व्यापारी पेठ म्हणून वावी ओळखली जाते. शिर्डी हमरस्त्यावरील महत्त्वाचे गाव असल्याने परिसरातील ३० ते ४० गावातील नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. कोरोना संसर्गामुळे ग्रामस्थांनी गेला संपूर्ण आठवडा स्वयंघोषित जनता कर्फ्यू पाळल्यानंतर मंगळवारपासून गावातील दुकाने उघडण्यात आली.भाजीबाजारातदेखील फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना तूर्तास बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील शेतकरी मात्र भाजीपाला विक्रीसाठी आणू शकणार आहेत.सरपंच नंदा गावडे, माजी उपसरपंच तथा कोरोना समन्वय समितीचे अध्यक्ष विजय काटे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कर्पे, कन्हैयालाल भुतडा, विजय सोमाणी, राजेंद्र धूत, ग्रामविकास संघाचे अध्यक्ष विलास पठाडे, आशिष माळवे, नंदलाल मालपाणी, संजय देशमुख, संतोष जोशी, रमेश गावडे, संदीप राजेभोसले, गावातील किराणा व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व अन्य व्यावसायिक या बैठकीला उपस्थित होते.---------------------------------यासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंतची वेळ व्यावसायिकांनी बैठकीत निश्चित करण्यात आली. फिजिकल डिस्टन्स पाळून व्यवसाय करावाफिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून सर्वांनी व्यवसाय करावा व सायं. ४ वाजेनंतर नंतर आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडे बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थगित करण्यात आला होता. केवळ भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विकण्यास व्यावसायिकांच्या बैठकीत परवानगी देण्यात आली होती.

टॅग्स :Nashikनाशिक