शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मार्केंडपिंप्रीतून पाणी न सोडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:12 IST

सप्तशृंगगडावरील आदीमायेच्या चैत्रोत्सवासाठी मध्य प्रदेशसह धुळे, जळगाव, नंदुरबार या आदीमायेच्या खान्देशातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी चणकापूर, गोबापूर, मार्केंडपिंप्री धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली असून, कळवण तालुक्यातील आठंबे, गोबापूर गावाजवळील नदीपात्रात असलेल्या अस्वच्छ (गाळ असलेल्या) पाण्याचा अंघोळीसाठी उपयोग करून देवीच्या दर्शनाची आस लागलेले देवीभक्त पायी अनवाणी मजल दरमजल करीत सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ होताना दिसत आहे.

कळवण : सप्तशृंगगडावरील आदीमायेच्या चैत्रोत्सवासाठी मध्य प्रदेशसह धुळे, जळगाव, नंदुरबार या आदीमायेच्या खान्देशातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी चणकापूर, गोबापूर, मार्केंडपिंप्री धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली असून, कळवण तालुक्यातील आठंबे, गोबापूर गावाजवळील नदीपात्रात असलेल्या अस्वच्छ (गाळ असलेल्या) पाण्याचा अंघोळीसाठी उपयोग करून देवीच्या दर्शनाची आस लागलेले देवीभक्त पायी अनवाणी मजल दरमजल करीत सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ होताना दिसत आहे. चैत्रोत्सवात पाणी सोडण्याची दरवर्षाची परंपरा प्रशासनाने खंडित केली आहे.  गोबापूर धरणात २४.८७ दशलक्ष घनफूट तर मार्केंडपिंप्री धरणात १५.२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.  देवीभक्तांची पाण्यावाचून गैरसोय होत असल्याने चणकापूर, गोबापूर व मार्केंडपिंप्री धरणातून तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ैजयश्री पवार यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.  सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला रामनवमीपासून सुरु वात झाली असून, महाराष्ट्रातील व शेजारील राज्यातील लाखो देवीभक्तांनी मनोभावे पूजा करून देवीचरणी नतमस्तक झाले. चैत्रोत्सव कालावधीत मध्य प्रदेश, धुळे, जळगाव, नंदुरबार या खान्देश भागातून येणाºया भाविकांसाठी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात तर गोबापूर व मार्केंडपिंप्री धरणातून बेहडी नदीपात्रात आतापर्यंत दरवर्षी पाणी सोडण्यात येते.  यंदा मात्र चैत्रोत्सव सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला तरी पाणी सोडण्यात आले नसल्याने नदीपात्रातील अस्वच्छ पाण्याचा अंघोळीसाठी वापर करताना दिसून येत आहे. रस्त्यावरील विहिरीवर देवीभक्तांची गर्दी दिसून येत असल्याने प्रशासनाच्या नकारघंटा भूमिकेमुळे लाखो देवीभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.  गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाला असला तरी विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मानूर, साकोरे, आठांबे, गोबापूर, नांदुरी येथे तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा टंचाई काळात साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव रामनवमीपासून सुरू झाला आहे.  देवीभक्तांना या पाण्याचा उपयोग होत नाही अशी तक्रार मार्केंडपिंप्री येथील ग्रामस्थांनी केली असून, पाणी सोडण्यास हरकत घेतली असल्याने पाणी सोडण्याची महसूल प्रशासनाने नकारघंटा वाजवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. बेहडी नदीपात्र कोरडेठाकदेवीभक्तांची पाण्यावाचून गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे विभाग दरवर्षी गोबापूर व मार्केंडपिंप्री धरणातून अनुक्र मे १० व ७ असे १७ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करून चैत्रोत्सव काळात बेहडी नदीपात्रात सोडले जाते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सोडण्यात येते. यंदा मात्र मार्केंडपिंप्री व गोबापूर धरणातून पाणी सोडण्यात आले नसल्याने बेहडी नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. बेहडी नदीपात्रात चैत्रोत्सवात पाणी सोडले तर ठिकठिकाणी सीमेंट बंधारे बांधण्यात आले असल्याने ते सर्व बंधारे भरले जातात.

टॅग्स :Nashikनाशिक