शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पांगरीकरांचे ठिय्या आंदोलन स्थगित मराठा क्रांती मोर्चा : समन्वयकांसह नायब तहसीलदारांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:55 IST

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्यासह सकल मराठा समाजाच्या पांगरी येथील बांधवांनी संत हरिबाबा मंदिराच्या प्रांगणात सोमवारपासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला होता. या आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावून पाठींबा दिला होता. शांततेच्या मार्गाने सुरु केलेल्या या ठिय्या आंदोलनात दररोज शाहीरांचे पोवाडे व कार्यक्रम होत होते.मराठा समाजाच्या नाशिक येथील ठिय्या आंदोलनाला दगडफेकीचे गालबोट लागल्यानंतर राज्य समन्वय समितीचा पुढील निर्णय होईपर्यंत जिल्'ातील आंदोलनांना स्थगिती देण्यात आली होती. तथापि, पांगरी येथे गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु होते. जिल्'ातील मराठा क्रांती मोर्चाने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी पांगरीकरांसोबत संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक येथील समन्वयक गणेश कदम, करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, सिन्नर येथील शरद शिंदे, डी. डी. गोर्डे यांनी ठिय्या मोर्चाला बसलेले विलास पांगारकर यांच्यासह मराठा समाज बांधवांची भेट घेतली. नाशिक जिल्'ातील आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याचे सांगून आपणही आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे देवून आंदोलनाची सांगता करावी अशी विनंती करण्यात आली.मराठा आंदोलनाची इतक्या दिवस गांभीर्याने दखल न घेतल्याने त्याचे रुपांतर ठोक मोर्चात झाले असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. मराठा समाजाचा असंतोष ठोक मोर्चातून दिसून आला. मात्र आंदोलन चुकीच्या मार्गाला गेले तर त्याचा त्रास पुढच्या पिढीला होईल. आंदोलन विधायक मार्गाने जावे. आत्महत्त्या व जाळपोळ होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे कोकाटे म्हणाले. समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी शांततेच्या मार्गान जावे असा सल्लाही कोकाटे यांनी दिला. त्यानंतर विलास पांगारकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा