शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

पांगरीकरांचे ठिय्या आंदोलन स्थगित मराठा क्रांती मोर्चा : समन्वयकांसह नायब तहसीलदारांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:55 IST

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्यासह सकल मराठा समाजाच्या पांगरी येथील बांधवांनी संत हरिबाबा मंदिराच्या प्रांगणात सोमवारपासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला होता. या आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावून पाठींबा दिला होता. शांततेच्या मार्गाने सुरु केलेल्या या ठिय्या आंदोलनात दररोज शाहीरांचे पोवाडे व कार्यक्रम होत होते.मराठा समाजाच्या नाशिक येथील ठिय्या आंदोलनाला दगडफेकीचे गालबोट लागल्यानंतर राज्य समन्वय समितीचा पुढील निर्णय होईपर्यंत जिल्'ातील आंदोलनांना स्थगिती देण्यात आली होती. तथापि, पांगरी येथे गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु होते. जिल्'ातील मराठा क्रांती मोर्चाने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी पांगरीकरांसोबत संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक येथील समन्वयक गणेश कदम, करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, सिन्नर येथील शरद शिंदे, डी. डी. गोर्डे यांनी ठिय्या मोर्चाला बसलेले विलास पांगारकर यांच्यासह मराठा समाज बांधवांची भेट घेतली. नाशिक जिल्'ातील आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याचे सांगून आपणही आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे देवून आंदोलनाची सांगता करावी अशी विनंती करण्यात आली.मराठा आंदोलनाची इतक्या दिवस गांभीर्याने दखल न घेतल्याने त्याचे रुपांतर ठोक मोर्चात झाले असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. मराठा समाजाचा असंतोष ठोक मोर्चातून दिसून आला. मात्र आंदोलन चुकीच्या मार्गाला गेले तर त्याचा त्रास पुढच्या पिढीला होईल. आंदोलन विधायक मार्गाने जावे. आत्महत्त्या व जाळपोळ होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे कोकाटे म्हणाले. समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी शांततेच्या मार्गान जावे असा सल्लाही कोकाटे यांनी दिला. त्यानंतर विलास पांगारकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा