शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पांगरीकरांचे ठिय्या आंदोलन स्थगित मराठा क्रांती मोर्चा : समन्वयकांसह नायब तहसीलदारांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:55 IST

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्यासह सकल मराठा समाजाच्या पांगरी येथील बांधवांनी संत हरिबाबा मंदिराच्या प्रांगणात सोमवारपासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला होता. या आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावून पाठींबा दिला होता. शांततेच्या मार्गाने सुरु केलेल्या या ठिय्या आंदोलनात दररोज शाहीरांचे पोवाडे व कार्यक्रम होत होते.मराठा समाजाच्या नाशिक येथील ठिय्या आंदोलनाला दगडफेकीचे गालबोट लागल्यानंतर राज्य समन्वय समितीचा पुढील निर्णय होईपर्यंत जिल्'ातील आंदोलनांना स्थगिती देण्यात आली होती. तथापि, पांगरी येथे गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु होते. जिल्'ातील मराठा क्रांती मोर्चाने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी पांगरीकरांसोबत संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक येथील समन्वयक गणेश कदम, करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, सिन्नर येथील शरद शिंदे, डी. डी. गोर्डे यांनी ठिय्या मोर्चाला बसलेले विलास पांगारकर यांच्यासह मराठा समाज बांधवांची भेट घेतली. नाशिक जिल्'ातील आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याचे सांगून आपणही आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे देवून आंदोलनाची सांगता करावी अशी विनंती करण्यात आली.मराठा आंदोलनाची इतक्या दिवस गांभीर्याने दखल न घेतल्याने त्याचे रुपांतर ठोक मोर्चात झाले असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. मराठा समाजाचा असंतोष ठोक मोर्चातून दिसून आला. मात्र आंदोलन चुकीच्या मार्गाला गेले तर त्याचा त्रास पुढच्या पिढीला होईल. आंदोलन विधायक मार्गाने जावे. आत्महत्त्या व जाळपोळ होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे कोकाटे म्हणाले. समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी शांततेच्या मार्गान जावे असा सल्लाही कोकाटे यांनी दिला. त्यानंतर विलास पांगारकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा