शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात मराठा समाजाचा मेळावा

By admin | Updated: September 8, 2016 00:47 IST

सटाण्यात मराठा समाजाचा मेळावा

सटाणा : समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी मराठा समाज नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे कायद्याचा दुरुपयोग अराजकता माजवत आहे. असे कायदे रद्द करण्यासाठी समाजाने संघटित होऊन येत्या २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित मूक मोर्चात बागलाणच्या समाजबांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी केले.या मोर्चाच्या नियोजनासाठी येथील आनंद लोन्स येथे आज मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना रामचंद्रबापू पाटील बोलत होते. सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.महाराष्ट्रात सत्तावीस टक्के समाज हा मराठा समाज आहे. असे असताना काही समाज विघातक मंडळी कायद्याचा दुरुपयोग करून अत्याचार करत आहे. यामुळे समाजातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.ती अबाधित राखण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा व समाजाला आरक्षण जाहीर करावे यासाठी मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी करण गायकर, मविप्रचे उपसभापती नानाजी दळवी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, अनिल पाटील, डॉ.प्रशांत पाटील, शैलेश सूर्यवंशी, ज.ल. पाटील, नगरसेवक काका रौंदळ, कुबेर जाधव, भाऊसाहेब अहिरे, कृष्णा भामरे, खेमराज कोर यांची भाषणे झाली.मेळाव्यास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राघोनाना अहिरे, अरविंद सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख शरद शेवाळे, वसंत भामरे, डॉ.भास्कर भामरे, नंदू सोनवणे, प्रकाश निकम, भाऊसाहेब राजे, मिलिंद शेवाळे, जयप्रकाश सोनवणे, सुहास पवार, पंकज सोनवणे, राहुल सोनवणे, योगेश सोनवणे, विजय सोनवणे यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)