शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

सरपंचपदाच्या आरक्षणामुळे अनेकांची होणार पंचाईत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:25 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे वगळता परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत निघणार असल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देइच्छुकांची कागदपत्रांची जुळवाजुळव : निवडणूकीची रणधुमाळी सुरू

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सहा महिने पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. कोणकोणाकडून उमेदवारी करू शकतो, याचे आडाखे बांधले जात असून, गावातील धनदांडग्यांना गळाला लावण्यासाठी गुप्त बैठका सुरू आहेत. त्यामुळे गावातील वातावरण आतापासून ढवळून निघाले असून, कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आगामी काळात होणाऱ्या बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, स्टाइस, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिसरातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, तसेच दोडी, दापूर, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ, सुरेगाव, खंबाळे, दातली, माळवाडी, दत्तनगर, चापडगाव, धुळवड, दोडी खुर्द, गोंदे, पाटोळे आदी गावात निवडणुकीचा धुराडा उडणार आहे.ऐन थंडीत गावगाडा तापणारऐन थंडीत नांदूरशिंगोटे परिसरात गावगाडा तापणार आहे. पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची तयारी सुरु केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने गावोगावचे पुढारी आता तयारीला लागले आहेत. गावातील प्रमुख नेतेमंडळीच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सत्ताधारी व विरोधकांचे गट गावात सक्रिय झाले असून, त्यांनी गावातील संपर्क वाढविला आहे. काहींनी तर खर्च करण्यासही सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. पुढाऱ्यांच्या घरी राबता वाढला आहे.उत्सुकता शिगेलाग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर काढले जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. तसेच यावेळी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत