शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:21 IST

इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.

ठळक मुद्देकसारा घाटातही रस्त्याला रविवारी तडे पडल्याने या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाउनची वाहतूक ठप्प झाली आहे. तर कसारा घाटातील जुना महामार्ग गेल्या आठवड्यापासून बंद असून नवीन कसारा घाटातून मुंबईला जाणारी व येणारी वाहतूक एकेरी मार्गाने संथ गतीने सुरू होती. नवीन कसारा घाटातही रस्त्याला रविवारी तडे पडल्याने या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असून, तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. यामुळे या सर्व धरणांतून हजारो क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याने गावांना जोडणारे बरेच पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्कतुटला आहे. इगतपुरी शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर दोन ते तीन फूट पाणी साठत असल्याने हे पाणी थेट नागरिकांच्या घरात व दुकानात घुसल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगावजवळ दोन ते तीन फूट दारणाकडे जाणारे पाणी थेट महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पाणी कमी झाल्यावर मुंबईला जाणारी वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली. तर नांदगावसदो, फांगुळगाव, पिंप्रीसदो आदी रस्त्यांवर पाणी आल्याने इगतपुरीत येण्यासाठी संपर्क तुटला होता.इगतपुरी शहरातील खालची पेठ परिसरात रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद होता. शहरातील लोया रोडवरती सर्व नाले तुंबले होते.लोकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. कॉन्व्हेंट हायस्कूलजवळील एक भिंतही पडली आहे. जोग महाराज भजनी मठ येथे जाणाºया रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.जुन्या आग्रा रोडवरील गिरणारे गावाला जाणाºया रस्त्यावर कमरेएवढे पाणी साचले होते. मोठ्या वाहनचालकांना कसरत करावी लागली.दारणातून ३९२५० क्यूसेक पाण्याचा विसर्गनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने रविवारी सकाळपासून सर्वत्र हाहाकार करायला सुरु वात केली असून, गेल्या २४ तासांत विक्र मी २२२ मिमी. पावसाची नोंद झाली. रविवारी एकूण ९८.३९ टक्के पाऊस पडला आहे. सकाळपासून तर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दारणा धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या धरणातून दारणा धरण भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जलसंपदा विभागाने रविवारी सकाळी नऊ वाजता विसर्ग सुरू केला. यंदाच्या पावसाळ्यात दारणातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला असून, सकाळी नऊ वाजेपासून सुमारे ३९२५० विक्र मी क्यूसेक प्रतिवेगाने पाणी नांदूरमधमेश्वरकडे निघालेले आहे.च्शहरातील रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता. बाजारातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने दुकानांचे हाल झाले होते. धुवाधार पाऊस पडत असल्याने ग्राहकांनी बाजारात येण्याचे टाळले, यामुळे बाजारपेठ मंदावली होती.