शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:21 IST

इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.

ठळक मुद्देकसारा घाटातही रस्त्याला रविवारी तडे पडल्याने या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाउनची वाहतूक ठप्प झाली आहे. तर कसारा घाटातील जुना महामार्ग गेल्या आठवड्यापासून बंद असून नवीन कसारा घाटातून मुंबईला जाणारी व येणारी वाहतूक एकेरी मार्गाने संथ गतीने सुरू होती. नवीन कसारा घाटातही रस्त्याला रविवारी तडे पडल्याने या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असून, तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. यामुळे या सर्व धरणांतून हजारो क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याने गावांना जोडणारे बरेच पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्कतुटला आहे. इगतपुरी शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर दोन ते तीन फूट पाणी साठत असल्याने हे पाणी थेट नागरिकांच्या घरात व दुकानात घुसल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगावजवळ दोन ते तीन फूट दारणाकडे जाणारे पाणी थेट महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पाणी कमी झाल्यावर मुंबईला जाणारी वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली. तर नांदगावसदो, फांगुळगाव, पिंप्रीसदो आदी रस्त्यांवर पाणी आल्याने इगतपुरीत येण्यासाठी संपर्क तुटला होता.इगतपुरी शहरातील खालची पेठ परिसरात रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद होता. शहरातील लोया रोडवरती सर्व नाले तुंबले होते.लोकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. कॉन्व्हेंट हायस्कूलजवळील एक भिंतही पडली आहे. जोग महाराज भजनी मठ येथे जाणाºया रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.जुन्या आग्रा रोडवरील गिरणारे गावाला जाणाºया रस्त्यावर कमरेएवढे पाणी साचले होते. मोठ्या वाहनचालकांना कसरत करावी लागली.दारणातून ३९२५० क्यूसेक पाण्याचा विसर्गनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने रविवारी सकाळपासून सर्वत्र हाहाकार करायला सुरु वात केली असून, गेल्या २४ तासांत विक्र मी २२२ मिमी. पावसाची नोंद झाली. रविवारी एकूण ९८.३९ टक्के पाऊस पडला आहे. सकाळपासून तर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दारणा धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या धरणातून दारणा धरण भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जलसंपदा विभागाने रविवारी सकाळी नऊ वाजता विसर्ग सुरू केला. यंदाच्या पावसाळ्यात दारणातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला असून, सकाळी नऊ वाजेपासून सुमारे ३९२५० विक्र मी क्यूसेक प्रतिवेगाने पाणी नांदूरमधमेश्वरकडे निघालेले आहे.च्शहरातील रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता. बाजारातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने दुकानांचे हाल झाले होते. धुवाधार पाऊस पडत असल्याने ग्राहकांनी बाजारात येण्याचे टाळले, यामुळे बाजारपेठ मंदावली होती.