शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती ... सटाणा : बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:39 IST

सटाणा : शहर स्वच्छता, शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज कचरा संकलन करून कचºयापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेला सटाण्यात प्रारंभ झाला. नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचºयाच्या बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.

सटाणा : शहर स्वच्छता, शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज कचरा संकलन करून कचºयापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेला सटाण्यात प्रारंभ झाला. नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचºयाच्या बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. संकलित कचºयावर प्रक्रि या होऊन त्याची विल्हेवाट लागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगर परिषदेने बायोमायनिंग प्रकल्प सुरू केला असून, शहरवासीयांनीही आत्ता घरोघरी कचºयाचे वर्गीकरण करून घंटागाडीचा वापर कटाक्षाने करावा. या बळावर शहर लवकरच स्वच्छतेबाबत लवकरच राष्ट्रीय पातळीवरील थ्री स्टार मानांकन प्राप्त करेल, असा आत्मविश्वास नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी यावेळी व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष मोरे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या तीन वर्षात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राहण्याकरिता नगर परिषदेकडून शहर स्वच्छतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाकांक्षी बायोमायनिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे, असे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. या प्रकल्पातून पस्तीस हजार टन कचºयाचे बायोमिनिंग होणार असून, गेल्या पन्नास वर्षापासून साठून राहिलेल्या कचºयाची येत्या सहा महिन्यात विल्हेवाट लागणार आहे. या प्रकल्पातून कचºयापासून खतनिर्मिती होणार असून, यापूर्वीच्या संपूर्ण कचºयाची विल्हेवाट लागल्यानंतर नगर परिषदेच्या मालकीची पाच एकर जमीन मोकळी होणार असल्याचेही नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. असा प्रकल्प राबविणारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगर परिषद ही पहिलीच असून, जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प एआर एनर्जी लिमिटेड मुंबई या कंपनीच्या सहकार्याने प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहर स्वच्छतेसाठी मोलाचा हातभार लागणार असून, शहरवासीयांनीही आता पुढे येऊन शहर स्वच्छतेशी संबंधित आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही मोरे यांनी केले. यावेळी उद्घाटक आमदार दिलीप बोरसे यांनी नगर परिषदेच्या कामकाजाबाबत कौतुक करून शहरवासीयांच्या सेवा सुविधांसाठी शासन स्तरावरून सदैव सहकार्य प्राप्त करून दिले जाईल, असे आश्वासन दिले. कार्यक्र मासाठी उपनगराध्यक्ष मुन्ना शेख, गटनेते राकेश खैरनार, आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, सभापती पुष्पाताई सूर्यवंशी, भारती सूर्यवंशी, संगीता देवरे, उपसभापती निर्मला भदाणे, नगरसेवक दीपक पाकळे, नितीन सोनवणे, राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर, दत्तू बैताडे, शिवाजी सोनवणे, आरोग्य निरीक्षक माणिक वानखेडे, शालिग्राम कोर, किशोर सोनवणे, शिवाजी सोनवणे आदींसह शहरवासीय उपस्थित होते.