शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

मनमाडकरांनो, ३१ जुलैपर्यंत वाट पाहा

By admin | Updated: May 27, 2014 16:59 IST

नाशिक : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाटोदा साठवण तलावाची क्षमता तिप्पट वाढल्याने यापुढे शहराला पाणीटंचाई भासणार नाही;

नाशिक : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाटोदा साठवण तलावाची क्षमता तिप्पट वाढल्याने यापुढे शहराला पाणीटंचाई भासणार नाही; परंतु या तलावातून वागदर्डी धरणात पाणी सोडण्यात काही तांत्रिक अडचणी असून, त्या कोणत्याही परिस्थितीत दोन महिन्यांत दूर करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ही योजना कार्यान्वित झाल्यास मनमाड शहराला दररोज किंवा दोन दिवसाआड कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मनमाड शहराला सध्या सतरा ते अठरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, मनमाड नगर परिषदेची संयुक्त बैठक घेतली. गेल्या तीन वर्षांपासून पाटोदा तलावाची साठवण क्षमता वाढविण्याचे काम करण्यात येत असून, त्यात आता १६ एमसीएफटी पाणी साठणार आहे. पाटोदा तलावातून वागदर्डी धरणात पाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन, पंपिंग, जॅकवेल, जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. मध्यंतरी या कामात संथपणा निर्माण झाल्याची कबुली भुजबळ यांनी दिली. पाटोदा तलावातील पाणी कमी झाल्याशिवाय काम करता येत नसल्यामुळे कामात अडथळे येत असले, तरी आता ही अडचण दूर झाली असून, फक्त १८०० मीटरच्या पाइपलाइनचे काम बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांची शेतीची कामे सुरू करण्यापूर्वीच पाइपलाइनची कामे पूर्ण करावीत व केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल सादर केला जावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. आजही पाटोदा साठवण तलावात मनमाड शहरासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे; परंतु विजेचे भारनियमन व वितरण व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांचा ‘अल्टीमेटम’ संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आला असून, ३१ जुलै ही अखेरची तारीख आहे. योजना पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध आहे. हे काम पूर्ण झाल्यास मनमाडकरांना दोन दिवसाआड पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल, असेही भुजबळ यांनी सांगितले. या बैठकीत विजेच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. वागदर्डी धरणाजवळ वीज कंपनीने एक्स्प्रेस फीडर बसविले असले, तरी अपुरा दाब व वीज भारनियमनामुळेही पाणी उचलण्यात अडचणी येत असल्याची बाब मनमाड नगर परिषदेच्या अध्यक्षांनी निदर्शनास आणून दिली असता, येत्या आठ-दहा दिवसांत नवीन फीडर बसविण्याचे आश्वासन देण्यात आले. गेल्या वर्षापेक्षा यंदा मनमाडची स्थिती चांगली असून, गेल्या वर्षी ४५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता; यंदा मात्र एकही टॅँकर नाही, असेही या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीस नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रांत अधिकारी महेश पाटील, नीलेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)