शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

ममदापुर येथील पाणी टँकरच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 19:45 IST

ममदापुर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमहिला आक्र मक : आठ दिवसा पासून नागरिकाचे हाल

ममदापुर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यात देखील परिसरातील छोटे मोठे बंधारे कोरडे होते तसेच विहिरींना पाणीच आले नाही. त्यामुळे परिसरातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, सोमठाण जोश, कोळगाव, रेंडाळा आदी गावांना मागील बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.गावातील टँकर दररोज येतो मग वाडी वस्तीवरील का येत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी व बोरवेल दोन्हीही कोरडेठाक असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्याची मोठी पंचायत झाली आहे. या परिसरातील शेतकरी हे आपल्या शेतातच राहतात. दरवर्षी शेतकºयांना पिण्यासाठी पुरेल एवढे पाणी विहिरींना असायचे किंवा बोरवेलला तरी पाणी शेतकºयांच्या कुटुंबाला व जनावरांना पिण्यासाठी पाणी असायचे, परंतु या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने गावाबरोबरच वाडी-वस्तीवरील शेतकºयांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून त्या प्रमाणात वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी वाटप करणे गरजेचे आहे.परंतु टँकर चालक शेतकरी, महिला यांच्यावर आरेरावीची भाषा वापरून पाणी वाटप करतांना प्रत्येकांशी हुज्जत घालतो अशी ओरड आहे. त्यामुळे सदर टँकर बदलून मिळावा आशी मागणी होत आहे. गावची लोकसंख्या विचारात घेता एका टँकरचे पाणी अपूर्ण पडत असल्याने वाडी-वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. बहुतेक शेतकºयांचे घर हे त्याच्या शेतात असल्याने शासनाने वाडी-वस्तीवर दुसरा नवीन टँकर सुरु करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणी पंचायत समिती सभापती यांच्याकडे ममदापूरच्या ग्रामस्थांनी तक्र ार केली आहे. टँकर चालकाच्या अरेरावीला नागरिक वैतागले असून दुसरा टँकर सुरू करावा अशी मागणी होत आहे. (फोटो १४ वॉटर शॉर्टेज)