शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!

By admin | Updated: July 15, 2014 22:47 IST

मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!

 मनमाड : मनमाड शहरासाठी मिळणाऱ्या पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनास झालेला विलंब व पावसाने मारलेली दडी यामुळे मनमाडकरांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. नुकतेच आवर्तनाचे पाणी वागदर्डी धरणात येऊन पोहोचले असून, शहराच्या अनेक भागांतील नळांना तब्बल २८ ते २९ दिवसांनी पाझर फुटला असून, तृषार्त मनमाडकरांची तहान तात्पुरती तरी भागली आहे. पालखेडच्या धरणातून सोडलेले पाणी मनमाडकरांना दोन महिने पुरवावे लागणार आहे.गेल्या वर्षीच्या जलसंकटानंतर पावसाळाही कोरडा गेला. त्यामुळे या वर्षी शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरलेच नाही. परिणामी मनमाडकरांना वर्षभर आवर्तनाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागले.मनमाडसाठी २ जुलैला पाण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित होते. मात्र लांबलेल्या पावसामुळे ते ७ जुलैला सोडण्यात आले. पाणीचोरीची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावापर्यंत पोहोचले. या आवर्तनामुळे सध्याच्या व्यवस्थेत मनमाडरांना दीड महिना पाणी पुरणार असल्याचा अंदाज आहे. हे लांबलेले आवर्तन व पावसाची हुलकावणी यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराच्या अनेक भागात २८ ते २९ दिवसांनंतर नळाला पाणी आले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या लाखभर लोकसंख्येच्या मनमाड शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दीड महिन्यात पाण्याच्या प्रश्नावर शहरात तब्बल पाच आंदोलने झाली. मनमाडची तहानलेली जनता पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने शहराचा पाणीप्रश्न राज्यात चर्चेचा विषय विषय बनला होता. वरुणराजाच्या अवकृपेमुळे सर्वत्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, या व मात करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये ४५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर ६० बोअरवेलचा समावेश आहे. सध्या शहरात पालिकेचे ३६५ हापसपंप असून, ते पावसाअभावी कोरडे पडले आहेत. टॅँकरला मंजुरी मिळाल्यास नाग्या साक्या धरणातून पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.