शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!

By admin | Updated: July 15, 2014 22:47 IST

मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!

 मनमाड : मनमाड शहरासाठी मिळणाऱ्या पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनास झालेला विलंब व पावसाने मारलेली दडी यामुळे मनमाडकरांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. नुकतेच आवर्तनाचे पाणी वागदर्डी धरणात येऊन पोहोचले असून, शहराच्या अनेक भागांतील नळांना तब्बल २८ ते २९ दिवसांनी पाझर फुटला असून, तृषार्त मनमाडकरांची तहान तात्पुरती तरी भागली आहे. पालखेडच्या धरणातून सोडलेले पाणी मनमाडकरांना दोन महिने पुरवावे लागणार आहे.गेल्या वर्षीच्या जलसंकटानंतर पावसाळाही कोरडा गेला. त्यामुळे या वर्षी शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरलेच नाही. परिणामी मनमाडकरांना वर्षभर आवर्तनाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागले.मनमाडसाठी २ जुलैला पाण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित होते. मात्र लांबलेल्या पावसामुळे ते ७ जुलैला सोडण्यात आले. पाणीचोरीची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावापर्यंत पोहोचले. या आवर्तनामुळे सध्याच्या व्यवस्थेत मनमाडरांना दीड महिना पाणी पुरणार असल्याचा अंदाज आहे. हे लांबलेले आवर्तन व पावसाची हुलकावणी यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराच्या अनेक भागात २८ ते २९ दिवसांनंतर नळाला पाणी आले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या लाखभर लोकसंख्येच्या मनमाड शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दीड महिन्यात पाण्याच्या प्रश्नावर शहरात तब्बल पाच आंदोलने झाली. मनमाडची तहानलेली जनता पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने शहराचा पाणीप्रश्न राज्यात चर्चेचा विषय विषय बनला होता. वरुणराजाच्या अवकृपेमुळे सर्वत्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, या व मात करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये ४५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर ६० बोअरवेलचा समावेश आहे. सध्या शहरात पालिकेचे ३६५ हापसपंप असून, ते पावसाअभावी कोरडे पडले आहेत. टॅँकरला मंजुरी मिळाल्यास नाग्या साक्या धरणातून पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.