शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!

By admin | Updated: July 15, 2014 22:47 IST

मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!

 मनमाड : मनमाड शहरासाठी मिळणाऱ्या पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनास झालेला विलंब व पावसाने मारलेली दडी यामुळे मनमाडकरांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. नुकतेच आवर्तनाचे पाणी वागदर्डी धरणात येऊन पोहोचले असून, शहराच्या अनेक भागांतील नळांना तब्बल २८ ते २९ दिवसांनी पाझर फुटला असून, तृषार्त मनमाडकरांची तहान तात्पुरती तरी भागली आहे. पालखेडच्या धरणातून सोडलेले पाणी मनमाडकरांना दोन महिने पुरवावे लागणार आहे.गेल्या वर्षीच्या जलसंकटानंतर पावसाळाही कोरडा गेला. त्यामुळे या वर्षी शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरलेच नाही. परिणामी मनमाडकरांना वर्षभर आवर्तनाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागले.मनमाडसाठी २ जुलैला पाण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित होते. मात्र लांबलेल्या पावसामुळे ते ७ जुलैला सोडण्यात आले. पाणीचोरीची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावापर्यंत पोहोचले. या आवर्तनामुळे सध्याच्या व्यवस्थेत मनमाडरांना दीड महिना पाणी पुरणार असल्याचा अंदाज आहे. हे लांबलेले आवर्तन व पावसाची हुलकावणी यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराच्या अनेक भागात २८ ते २९ दिवसांनंतर नळाला पाणी आले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या लाखभर लोकसंख्येच्या मनमाड शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दीड महिन्यात पाण्याच्या प्रश्नावर शहरात तब्बल पाच आंदोलने झाली. मनमाडची तहानलेली जनता पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने शहराचा पाणीप्रश्न राज्यात चर्चेचा विषय विषय बनला होता. वरुणराजाच्या अवकृपेमुळे सर्वत्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, या व मात करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये ४५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर ६० बोअरवेलचा समावेश आहे. सध्या शहरात पालिकेचे ३६५ हापसपंप असून, ते पावसाअभावी कोरडे पडले आहेत. टॅँकरला मंजुरी मिळाल्यास नाग्या साक्या धरणातून पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.