शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:57 IST

अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते.

पंचवटी : अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते. मनुष्यजन्म केवळ भक्ती करण्यासाठी मिळाल्याचे प्रतिपादन अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.पेठरोडवरील रामशेज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठातर्फे बुधवारी (दि.२२) समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी नरेंद्राचार्य यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी पुढे असे सांगितले की, सत्कर्म करून जास्तीत जास्त पुण्य या जन्मात मिळवावे. पापसुद्धा याच जन्मात फेडावे लागते ते दु:खाच्या स्वरूपात. जीवनात दु:ख निर्माण होणार नाही यासाठी दिवसातून किमान दहा मिनिटे मन एकाग्र करा. मनात दुसरा कोणताच विचार आणू नये. मनाला भक्तीचा व्यायाम द्यावा. असे केल्याने कोणत्याही देवाची माणसाला गरज पडणार नाही, तो स्वत:च स्वत:च्या समस्येवर मात करू शकतो. जास्त अपेक्षा हेच खरे दु:खाचे कारण आहे. दु:खाचे आणखी कारण सांगताना स्वामीजी म्हणाले की, आपण दिवसभरात जे निर्णय घेतो ते फार महत्त्वाचे आहे. निर्णय बिनचूक घेतल्यास दु:ख निर्माण होत नाही. त्यासाठी संयम मात्र महत्त्वाचा आहे. समयसुचकता अंगी असल्यास समस्या निर्माण होत नाही. दानाचे महत्त्व सांगताना त्यांनी समाजोपयोगी सेवेत भाविकांनी रक्तदान, अवयवदान, अन्नदान, श्रमदान यांपैकी कोणतेही दान करावे. समाजाच्या सेवेतदेखील गुरू सेवा आहे, तसे ते शेवटी म्हणाले. यावेळी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक