शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:57 IST

अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते.

पंचवटी : अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते. मनुष्यजन्म केवळ भक्ती करण्यासाठी मिळाल्याचे प्रतिपादन अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.पेठरोडवरील रामशेज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठातर्फे बुधवारी (दि.२२) समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी नरेंद्राचार्य यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी पुढे असे सांगितले की, सत्कर्म करून जास्तीत जास्त पुण्य या जन्मात मिळवावे. पापसुद्धा याच जन्मात फेडावे लागते ते दु:खाच्या स्वरूपात. जीवनात दु:ख निर्माण होणार नाही यासाठी दिवसातून किमान दहा मिनिटे मन एकाग्र करा. मनात दुसरा कोणताच विचार आणू नये. मनाला भक्तीचा व्यायाम द्यावा. असे केल्याने कोणत्याही देवाची माणसाला गरज पडणार नाही, तो स्वत:च स्वत:च्या समस्येवर मात करू शकतो. जास्त अपेक्षा हेच खरे दु:खाचे कारण आहे. दु:खाचे आणखी कारण सांगताना स्वामीजी म्हणाले की, आपण दिवसभरात जे निर्णय घेतो ते फार महत्त्वाचे आहे. निर्णय बिनचूक घेतल्यास दु:ख निर्माण होत नाही. त्यासाठी संयम मात्र महत्त्वाचा आहे. समयसुचकता अंगी असल्यास समस्या निर्माण होत नाही. दानाचे महत्त्व सांगताना त्यांनी समाजोपयोगी सेवेत भाविकांनी रक्तदान, अवयवदान, अन्नदान, श्रमदान यांपैकी कोणतेही दान करावे. समाजाच्या सेवेतदेखील गुरू सेवा आहे, तसे ते शेवटी म्हणाले. यावेळी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक