शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:57 IST

अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते.

पंचवटी : अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते. मनुष्यजन्म केवळ भक्ती करण्यासाठी मिळाल्याचे प्रतिपादन अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.पेठरोडवरील रामशेज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठातर्फे बुधवारी (दि.२२) समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी नरेंद्राचार्य यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी पुढे असे सांगितले की, सत्कर्म करून जास्तीत जास्त पुण्य या जन्मात मिळवावे. पापसुद्धा याच जन्मात फेडावे लागते ते दु:खाच्या स्वरूपात. जीवनात दु:ख निर्माण होणार नाही यासाठी दिवसातून किमान दहा मिनिटे मन एकाग्र करा. मनात दुसरा कोणताच विचार आणू नये. मनाला भक्तीचा व्यायाम द्यावा. असे केल्याने कोणत्याही देवाची माणसाला गरज पडणार नाही, तो स्वत:च स्वत:च्या समस्येवर मात करू शकतो. जास्त अपेक्षा हेच खरे दु:खाचे कारण आहे. दु:खाचे आणखी कारण सांगताना स्वामीजी म्हणाले की, आपण दिवसभरात जे निर्णय घेतो ते फार महत्त्वाचे आहे. निर्णय बिनचूक घेतल्यास दु:ख निर्माण होत नाही. त्यासाठी संयम मात्र महत्त्वाचा आहे. समयसुचकता अंगी असल्यास समस्या निर्माण होत नाही. दानाचे महत्त्व सांगताना त्यांनी समाजोपयोगी सेवेत भाविकांनी रक्तदान, अवयवदान, अन्नदान, श्रमदान यांपैकी कोणतेही दान करावे. समाजाच्या सेवेतदेखील गुरू सेवा आहे, तसे ते शेवटी म्हणाले. यावेळी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक