शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

वडाळावासीयांच्या नशिबी मातीमिश्रित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:19 IST

पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती.

नाशिक : पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती. जणू वडाळावासीयांच्या पाचवीलाच अशुद्ध पाणीपुरवठा पुजलेला आहे की काय? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या हद्दीत समावेश होऊन अनेक वर्षे लोटली तरी विविध मुलभूत सोयी-सुविधांसाठी वडाळावासीयांच्या नशिबी असलेला संघर्ष अद्याप ‘जैसे-थे’ आहे. पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात विषमज्वर, विषाणुजन्य सांधेदुखी, ताप, डोके दुखी, उलट्या, अतिसार अशा आजाराचे रुग्ण वाढले आहे. ‘लोकमत’मधून सातत्याने नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडली जात असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने खडबडून जागे होत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या; मात्र पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार अद्याप थांबलेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शनिवारी (दि.३०) वडाळागावातील झीनतनगर, रजा चौक, राजवाडा, माळी गल्ली, गरीब नवाज कॉलनी, रामोशीवाडा, कोळीवाडा, गोपालवाडी या भागात मातीमिश्रित दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा तासभर झाला. साथीचे आजार व विषाणुजन्य आजाराचे रुग्ण वरील भागातूनच सर्वाधिक आढळले असून, याच भागाला पुन्हा दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे.जलवाहिनी दुरुस्तीचे कारणवडाळागाव परिसरात सकाळी झालेल्या दूषित पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले; मात्र तब्बल तासभर नळांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकही चक्रावले. नळ वाहते ठेवून रहिवाशांना शुद्ध स्वरूपाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागली.

टॅग्स :Waterपाणी