शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

वडाळावासीयांच्या नशिबी मातीमिश्रित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:19 IST

पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती.

नाशिक : पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती. जणू वडाळावासीयांच्या पाचवीलाच अशुद्ध पाणीपुरवठा पुजलेला आहे की काय? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या हद्दीत समावेश होऊन अनेक वर्षे लोटली तरी विविध मुलभूत सोयी-सुविधांसाठी वडाळावासीयांच्या नशिबी असलेला संघर्ष अद्याप ‘जैसे-थे’ आहे. पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात विषमज्वर, विषाणुजन्य सांधेदुखी, ताप, डोके दुखी, उलट्या, अतिसार अशा आजाराचे रुग्ण वाढले आहे. ‘लोकमत’मधून सातत्याने नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडली जात असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने खडबडून जागे होत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या; मात्र पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार अद्याप थांबलेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शनिवारी (दि.३०) वडाळागावातील झीनतनगर, रजा चौक, राजवाडा, माळी गल्ली, गरीब नवाज कॉलनी, रामोशीवाडा, कोळीवाडा, गोपालवाडी या भागात मातीमिश्रित दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा तासभर झाला. साथीचे आजार व विषाणुजन्य आजाराचे रुग्ण वरील भागातूनच सर्वाधिक आढळले असून, याच भागाला पुन्हा दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे.जलवाहिनी दुरुस्तीचे कारणवडाळागाव परिसरात सकाळी झालेल्या दूषित पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले; मात्र तब्बल तासभर नळांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकही चक्रावले. नळ वाहते ठेवून रहिवाशांना शुद्ध स्वरूपाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागली.

टॅग्स :Waterपाणी