शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मालेगावचा पारा चढू लागला

By admin | Updated: February 19, 2015 00:01 IST

आरोग्याच्या तक्रारी : रस्ते ओस पडू लागले

  मालेगाव कॅम्प : शहर परिसरात वसंत ऋतुची चाहूल लागली असून, वाढत्या उन्हामुळे तपमानात वाढ झाली आहे. दिवसभर वाढलेली उष्णता व रात्री काही प्रमाणात थंडीचे वातावरण या बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रासले आहेत. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे, तर शहरातील रस्तेही दुपारी ओस पडू लागले आहेत.शहर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत वातावरणात बदल दिसून आला. ऐन पावसाळ्यात अनेक दिवस पावसाने पाठ दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. नंतर पाऊस काही प्रमाणात झाला. नियमित पारंपरिक पिकांची पेरणीही झाली; परंतु पावसाळ्याच्या अखेरीस वातावरणात बदल होऊन बेमोसमी पाऊस व गारपिटीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांना थंडीचा सामना करावा लागला होता. कडाक्याच्या थंडीने नागरिक हतबल झाले होते. काही दिवसांपासून परिसरात वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर उन्हाच्या झळा, तर पहाटेपर्यंत थंडी असे वातावरण तयार झाले आहे. थंडीमुळे दिवसभर बंद असलेले घरातील पंखे व कुलर, वातानुकूलित यंत्रणा पुन्हा दिवसा सुरू झाल्या आहेत. या ऊन व थंडीच्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त होत आहे. नागरिकांना वाढत्या उष्म्यामुळे शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी दवाखाने गाठावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आगामी मार्च, एप्रिल व मे ह्या महिन्यांत कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे आतापासून नागरिकांनी काळजी घेण्याची तयारी दिसून येत आहे. (वार्ताहर)