शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठावरील झोपड्यांसाठी मालेगावी दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, ...

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, खलीलशेठ चाळ जवळचा भाग, ढोरवस्ती, सांडवा पूल, चावचावनगर, बजरंगवाडी, अमरधाम, स्मशानभूमी, आदिवासीनगर, भिकनशाह दरगाह जवळील भाग, बाहरा बाग, सिद्धार्धनगर, सर्व्हे नं. ५५ नदीकिनारचा भाग, किल्ला झोपडपट्टी, ईदगाह झोपडपट्टी, भायगाव, माणिकनगर, पवारवाडी हा भाग नद्यांना पूर आल्यानंतर पूरस्थितीत वेढला जातो. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पूरपाणी गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडतात. महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाची नुकतीच बैठक मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात सुकाणू समिती व विविध विभागप्रमुख उपस्थित होते. पावसाळ्यात नदीकाठावरील झोपडपट्टी भागात उपाययोजना करण्यात येत आहेत.

शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात येत आहेत. शहरातील सर्व बांधकाम साहित्य पावसाळ्यापूर्वी उचलून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंधारा किंवा नाला अथवा नाल्यावरील पूल फुटल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे ठरविण्यात आले. धरणे व पाटबंधारे विभागाशी संपर्क व समन्वय ठेवून वेळोवेळी धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबत माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याच्या टाक्यांवरील वीजरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरात पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येणार असून दूषित पाणीपुरवठा होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. सर्व ड्रेनेजचे चोकअप काढण्यात येत आहे. भूमिगत गटारी पावसाळ्यात तुंबणार नाहीत, याची खबरदारी मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून घेण्यात येत आहे.

नदीकाठच्या लोकांना पुराच्या धोक्याची सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात राेगराई पसरू नये म्हणून औषधफवारणी करण्यात येत आहे. नदीनाल्यांमधील गाळ काढून नद्यांना प्रवाही करण्यात येत आहे. शहरात पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्त्यावर पडलेले पोल विद्युत विभागातर्फे काढून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक सुसज्ज करण्यात आले आहे. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. झोपड्यांना पुराचा धोका संभवत असेल. तर त्या झोपड्या काढून टाकण्याची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

धाेकादायक आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित भागातील शाळा, समाजमंदिरे, मंगल कार्यालये, कॉलेजेस आणि खाजगी शाळा ताब्यात घेण्यात येणार आहेत. पूरपरिस्थितीची एखादी आपत्ती उद्भवल्यास जखमी नागरिकांना रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत जीवरक्षक आणि पोहणारे कर्मचारी यांच्याकरिता लाइफ रिंग, लाइफ जॅकेट व इतर साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगररचना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यांच्या राहण्याची, भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. १ जूनपासून कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५५४ २३१९५० असा आहे. अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी काम करीत आहेत. पूरस्थिती हाताळताना नागरिकांचा बचाव करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, टीपर, डंपर, वाॅटर टँकर, लाइफगार्ड टँकर, दोर, आदी साहित्य आहे. धोकादायक २१० घरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आयेशानगरातील स्वीपर कॉलनी स्थलांतरित करण्यात आली आहे.