शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

नदीकाठावरील झोपड्यांसाठी मालेगावी दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, ...

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, खलीलशेठ चाळ जवळचा भाग, ढोरवस्ती, सांडवा पूल, चावचावनगर, बजरंगवाडी, अमरधाम, स्मशानभूमी, आदिवासीनगर, भिकनशाह दरगाह जवळील भाग, बाहरा बाग, सिद्धार्धनगर, सर्व्हे नं. ५५ नदीकिनारचा भाग, किल्ला झोपडपट्टी, ईदगाह झोपडपट्टी, भायगाव, माणिकनगर, पवारवाडी हा भाग नद्यांना पूर आल्यानंतर पूरस्थितीत वेढला जातो. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पूरपाणी गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडतात. महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाची नुकतीच बैठक मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात सुकाणू समिती व विविध विभागप्रमुख उपस्थित होते. पावसाळ्यात नदीकाठावरील झोपडपट्टी भागात उपाययोजना करण्यात येत आहेत.

शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात येत आहेत. शहरातील सर्व बांधकाम साहित्य पावसाळ्यापूर्वी उचलून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंधारा किंवा नाला अथवा नाल्यावरील पूल फुटल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे ठरविण्यात आले. धरणे व पाटबंधारे विभागाशी संपर्क व समन्वय ठेवून वेळोवेळी धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबत माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याच्या टाक्यांवरील वीजरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरात पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येणार असून दूषित पाणीपुरवठा होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. सर्व ड्रेनेजचे चोकअप काढण्यात येत आहे. भूमिगत गटारी पावसाळ्यात तुंबणार नाहीत, याची खबरदारी मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून घेण्यात येत आहे.

नदीकाठच्या लोकांना पुराच्या धोक्याची सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात राेगराई पसरू नये म्हणून औषधफवारणी करण्यात येत आहे. नदीनाल्यांमधील गाळ काढून नद्यांना प्रवाही करण्यात येत आहे. शहरात पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्त्यावर पडलेले पोल विद्युत विभागातर्फे काढून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक सुसज्ज करण्यात आले आहे. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. झोपड्यांना पुराचा धोका संभवत असेल. तर त्या झोपड्या काढून टाकण्याची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

धाेकादायक आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित भागातील शाळा, समाजमंदिरे, मंगल कार्यालये, कॉलेजेस आणि खाजगी शाळा ताब्यात घेण्यात येणार आहेत. पूरपरिस्थितीची एखादी आपत्ती उद्भवल्यास जखमी नागरिकांना रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत जीवरक्षक आणि पोहणारे कर्मचारी यांच्याकरिता लाइफ रिंग, लाइफ जॅकेट व इतर साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगररचना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यांच्या राहण्याची, भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. १ जूनपासून कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५५४ २३१९५० असा आहे. अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी काम करीत आहेत. पूरस्थिती हाताळताना नागरिकांचा बचाव करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, टीपर, डंपर, वाॅटर टँकर, लाइफगार्ड टँकर, दोर, आदी साहित्य आहे. धोकादायक २१० घरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आयेशानगरातील स्वीपर कॉलनी स्थलांतरित करण्यात आली आहे.