शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

मालेगाव - टेहरे वाहतूक बंद

By admin | Updated: September 19, 2015 23:59 IST

गिरणा नदीला पूर : पुलाचा भराव गेला वाहून

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत पडलेल्या पावसाने येथील गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पाण्याने टेहरे येथील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता कमी असताना रहदारीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या पाण्याने पुलाचा भराव वाहून गेला असल्याचे कारण सांगितले जात आहे. तालुक्यासह कळवण, बागलाण, देवळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसाने नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. परिसरातील हरणबारी व चणकापूर धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गिरणा नदीत ठेंगोडा बंधाऱ्यावरून १४ हजार ४४० क्यूसेक्स तर चणकापूर धरणातून तीन हजार ५२४ क्यूसेक्स पाणी असे एकूण सध्या १८ हजार ६६४ क्यूसेक्स पाणी वाहत आहे. हे पाणी काल रात्री शहरातजवळ पोहोचले आहे. या पुरामुळे येथील सोयगाव ते टेहरे यांना जोडणाऱ्या पुलाचा सोयगाव बाजूकडील मातीचा भराव वाहून गेला आहे. हा भराव वाहून गेल्याने येथे मोठे खड्डे पडल्याने पुलाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचा वेग पाहून व पुलाच्या भरावाची स्थिती पाहून हा पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे येथील छावणी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सोयगाव चौफुलीजवळ संरक्षक जाळ्या लावून रहदारीसाठी बंद केला आहे, तर टेहरे बाजूकडे पुलावर काटेरी बाभूळ लावून बंद केला आहे. नदीला आलेल्या पहिल्याच पुरात पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे सुमारे दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या गुणवत्तेविषयी शंका उपस्थित होत आहे. हा पूल बांधल्यानंतर पहिल्यांदाच दुथडी भरून नदीला पूर आला असल्याचे बोलले जाते. गेल्या पावसाळ्यात गिरणेला पाणी आले असले तरी त्याचे प्रमाण कमी होते. त्यात पाण्याचा जोर कमी होता. यंदा मात्र पाण्याला जोर जास्त असल्याने हा भराव वाहून गेल्याचे बोलले जाते. यामुळे पुलावर खर्च करण्यात आलेले लाखो रुपये वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)