शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मालेगावचे वीज कर्मचारी मदतीसाठी रायगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:28 IST

मालेगाव : राज्यात आलेल्या चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रायगड जिल्ह्यात विजेचे खांब आणि रोहित्र कोलमडून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मालेगाव : राज्यात आलेल्या चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रायगड जिल्ह्यात विजेचे खांब आणि रोहित्र कोलमडून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील वीज वितरण विभागाचे कर्मचारी रायगड जिल्ह्यात रवाना झाले असून, तेथील वीजपुरवठा सुरळीत करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करीत आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मालेगाव मंडळातील अभियंते व जनमित्र रायगड जिल्ह्याकडे रवाना झाले. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीरतसेच अधीक्षक अभियंता रमेश सानप यांनी मार्गदर्शन केले. त्यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व मास्क वापरायच्या सूचना दिल्या. वीजपुरवठा जलद गतीने पूर्ववत करण्याचे तसेच विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले.विद्युत सुरक्षा साहित्य, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर राखीत सदर तीन खासगी लक्झरी बस रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे प्रतिनिधी प्रवीण वाघ, गुरुदास वाघ, प्रभाकर व्यवहारे, दीपक भामरे, किशोर पवार, राजेंद्र देसले आदी उपस्थित होते.--------------------७८ जणांचा समावेशनिसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन उपविभागात कोलमडलेली यंत्रणा व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नाशिक परिमंडळच्या मालेगाव मंडळातील ९ अभियंते, ६७ जनमित्र असे एकूण ७८ जण मदतीसाठी सोमवारी रवाना झाले आहेत. पेण मंडळ कार्यालयात सर्व जर्मचारी राहत असून पेण, श्रीवर्धन व रायगड जिल्ह्यात वादळाने पडलेले विजेचे खांब उभे करून वीजपुरवठा सुरळीत करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक