शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मालेगाव : जादा भाडे आकारणीमुळे प्रवाशांत संताप ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:59 IST

मालेगाव : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे करण्यात आली.

मालेगाव : शहरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कानाकोपºयातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांत शिक्षण घेत आहेत. सणासुदीच्या किंवा सलग दोन-तीन दिवसांच्या सुट्या मिळाल्या की साहजिक ते घरी येतात. अशावेळी सर्व ट्रॅव्हल्सवाले अडवणूक करून अवास्तव भाडे आकारणी करतात. हे भाडे तीन ते चारपट जास्त असते. लोक मनमानी करून क्षणाक्षणाला भाडे बदलत असतात. जसजशी गाडी भरत जाते तसतसे भाडे जास्त होत जाते. तसेच स्टार्टिंग पॉइंटपासून भाडे आकारणी करतात. शिवजयंतीला मालेगाव ते पुणे एका व्यक्तीचे १२०० रुपये भाडे आकारले. विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तसेच रस्त्यात काही झाले तर त्याचीही जबाबदारी घेत नाही. रिक्षा, टॅक्सी यांचे भाडे आपल्या-मार्फत ठरवून त्यांच्यावर आपले नियंत्रण असते, मग ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी हे नियम का नाही? मागणी बघून भाडे बदलले जाते ही अडवणूक असून, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अनुचित व्यापार पद्धती नाही का? योग्य तेच भाडे कायमस्वरूपी ठरविण्यात येऊन ग्राहक संरक्षण कायद्याचे पालन करून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक अध्यक्ष हरीश मारू, सहसंघटक सोहनलाल जैन, उमेश शहा, कैलास शर्मा, राहुल आघारकर, अशोक बागुल, संजय पांडे आदि पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.