शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

मालेगाव महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 00:45 IST

मालेगाव : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन दोन दशके उलटली आहेत तरीदेखील महापालिकेने शहरात वृक्ष गणना केली नसल्याची धक्कादायक बाब ...

ठळक मुद्देवृक्ष कर भरूनही नागरिक सावलीपासून वंचित : केवळ १७२ दुर्मीळ वृक्षांची नोंद

मालेगाव : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन दोन दशके उलटली आहेत तरीदेखील महापालिकेने शहरात वृक्ष गणना केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर पडला आहे. नागरिकांना वृक्ष कर भरूनही सावलीपासून वंचित राहावे लागत आहे. केवळ पन्नास वर्षांपुढील १७२ वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. सुमारे साडेसात लाख लोकवस्तीच्या शहरात झाडांची संख्या कमी असल्याने याचा थेट परिणाम पर्यावरणावर पडत आहे.महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ नुसार शहरात व्यक्तीमागे दोन वृक्ष असणे बंधनकारक आहे. त्यानुसार मालेगाव शहरात कमीत कमी ९ लाख वृक्षांची आवश्यकता आहे; मात्र महापालिकेने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाकडे सक्षम पाठ फिरवली आहे. वृक्ष लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शहर स्वच्छता, मोसम नदी सुशोभीकरण, एकेरी वाहतूकसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. शहरातील पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत एकदाही पर्यावरण स्थिती दर्शक अहवाल सादर केला नाही. कुठल्याही प्रकारची पाण्यावर प्रक्रिया न करता सर्रासपणे मोसम नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. अयोग्य पद्धतीने होणारा घनकचरा संकलन, अवजड वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वृक्ष लागवड व संवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे मालेगावी पर्यावरणाचा बोजवारा उडाला आहे. केंद्र व राज्य पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहराचा वार्षिक पर्यावरण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र या निर्देशांना महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जाते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पर्यावरण अहवालासाठी तरतूद करण्यात येते; मात्र वृक्ष लागवडीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.मनपाचे पर्यावरणाकडे दुर्लक्षनगरपालिका व महापालिका स्थापनेनंतरही शहरात एकदाही वृक्ष गणना झाली नाही. त्यामुळे शहरात किती वृक्ष आहेत याबाबत प्रशासनच अनभिज्ञ आहे. येथील तरुणाई व ग्रीन मालेगाव ड्राइव्ह व नैसर्गिकरीत्या जगलेली सुमारे १५ ते २० हजार झाडे असल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी ५० वर्षांपुढील दुर्मीळ झाडे १७२ असल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. महापालिका क्षेत्रात दरवर्षी वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. 

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार