शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मालेगावचा पारा ४३ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:15 IST

शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते.

मालेगाव : शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते.  गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर व तालुक्याच्या तपमानाने चाळिशी पार केली  आहे. दररोज तपमानात वाढ होत असल्याने नागरिक उन्हाच्या तीव्रतेमुळे हैराण झाले आहेत. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. भरउन्हात आप्तेष्ट नातेवाइकांची लग्नांना हजेरी लावण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे. दुपारच्या सत्रात कडक ऊन असल्यामुळे नागरिक उपरणे, टोपी, गॉगल आदींचा आधार घेत उन्हापासून बचाव करीत आहेत.  उन्हामुळे विकारांमध्येही वाढ झाली आहे. आबालवृद्धांना उन्हाचा त्रास होत आहे. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाढत्या उन्हामुळे मजूर कामाला येण्यास नकार देत आहेत. शेत शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांचा व पिकांचा पिण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. बहुतांशी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तर बारा गाव योजना, २६ गाव योजना, माळमाथा पाणीपुरवठा आदी योजनांद्वारे आठ-आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे.  माळमाथा व काटवन भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक दिसून येत आहे. तालुक्यातील सातही लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उन्हाच्या तीव्रतेत अशीच वाढ  होत राहिली तर जनजीवनावर विपरित परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.बर्फापासून व्हा सावध !उन्हाच्या तीव्रतेने जिवाची काहिली होत असल्यामुळे मालेगावकर दिलासा मिळवण्यासाठी शीतपेय व बर्फाचा वापर असलेले पदार्थ सेवन करताना दिसून येत आहेत; मात्र बर्फामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बर्फाची शुद्धता व दर्जाबाबत साशंकता आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहावे यासाठी भरपूर पाणी प्यावे; मात्र उन्हातून आल्यास तत्काळ फ्रीज किंवा माठामधील पाणी पिणे टाळावे. काही वेळ शांत बसल्यानंतर हळूहळू पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच जास्त वेळ घराबाहेर उन्हात राहणाऱ्या लोकांनी उसाचा रस किंवा अन्य प्रकारच्याफ ळांचा रस पिणे टाळावे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :Temperatureतापमान