शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

मालेगावची मका खरेदी योजना अडकली वादाच्या भोवºयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:52 IST

मालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे असहकार्य : शेतकी संघ अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांची हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.दीड महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करूनही अनेक शेतकºयांचा मका मोजला गेला नाही. शिवाय तालुक्यात केंद्र शासनाचीकिमान आधारभूत किंमत भरडधान्य खरेदी योजना बंद झाली. या कुचकामी योजनेमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकºयांना आर्थिक डबघाईस सामोरे जावे लागतआहे.उघड्यावर पडलेल्या मक्याचे नुकसानशेतकरीहिताच्या योजना तत्काळ राबवल्या जात नसल्याने सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे. निसर्गाचा प्रकोप, कोरोनाचे सावट अशा चक्रव्यूहात सापडलेला बळीराजा धास्तावला आहे. शासनाने योजनेची घोषणा केली नसती तर शेतकºयांनी मिळेल त्या दरात मका विक्री केली असती. आज मोजणी होईल, उद्या होईल या आशेवर बळीराजा होता; मात्र दररोज फक्त आठ ते दहा शेतकºयांचा मका मोजला जात होता. एक पोते मका मोजण्यासाठी ३० रुपये वसूल केले जात होते, अशी कैफियत एका शेतकºयाने मांडली.मका खरेदी होत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या जीवनाशी खेळ होत आहे. उघड्यावर पडलेला मकाचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने खराब होत चाललेल्या मका पिकाचे काय करावे, या समस्येने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. शेतकºयांची अवस्था चिंताजनक असून, सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटात सापडलेला शेतकरी भरडला जात आहे.आर्थिक कोंडीकोरोना पार्श्वभूमीमुळे लॉकडाऊनच्या काळात लिलाव बंद होते. माल विकला जात नाही. शेतकरी मरणयातना भोगत असताना शेतमाल विकला जात नव्हता. तसेच शेतकºयाची आर्थिक कोंडी झाली असताना शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शेतकºयांसाठी असलेला योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे न करता अडथळे निर्माण होत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याची मागणी होत आहे.योजना यशस्वी करण्यासाठी नियोजन व इच्छाशक्तीची आवश्यकता होती. मात्र मका मोजणीसाठी शेतकºयांना अतोनात त्रास सहन करावा लागला. तीन-चार दिवस नंबर लावून थांबण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली. मका मोजणी योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. खुल्या बाजारात १३०० पर्यंत दर मिळतो आहे. ५०० रुपये जास्त दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी हतबल झाला आहे. इतक्या वेळखाऊ आणि त्रासदायक योजना नको असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार