शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावची मका खरेदी योजना अडकली वादाच्या भोवºयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:52 IST

मालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे असहकार्य : शेतकी संघ अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांची हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.दीड महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करूनही अनेक शेतकºयांचा मका मोजला गेला नाही. शिवाय तालुक्यात केंद्र शासनाचीकिमान आधारभूत किंमत भरडधान्य खरेदी योजना बंद झाली. या कुचकामी योजनेमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकºयांना आर्थिक डबघाईस सामोरे जावे लागतआहे.उघड्यावर पडलेल्या मक्याचे नुकसानशेतकरीहिताच्या योजना तत्काळ राबवल्या जात नसल्याने सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे. निसर्गाचा प्रकोप, कोरोनाचे सावट अशा चक्रव्यूहात सापडलेला बळीराजा धास्तावला आहे. शासनाने योजनेची घोषणा केली नसती तर शेतकºयांनी मिळेल त्या दरात मका विक्री केली असती. आज मोजणी होईल, उद्या होईल या आशेवर बळीराजा होता; मात्र दररोज फक्त आठ ते दहा शेतकºयांचा मका मोजला जात होता. एक पोते मका मोजण्यासाठी ३० रुपये वसूल केले जात होते, अशी कैफियत एका शेतकºयाने मांडली.मका खरेदी होत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या जीवनाशी खेळ होत आहे. उघड्यावर पडलेला मकाचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने खराब होत चाललेल्या मका पिकाचे काय करावे, या समस्येने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. शेतकºयांची अवस्था चिंताजनक असून, सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटात सापडलेला शेतकरी भरडला जात आहे.आर्थिक कोंडीकोरोना पार्श्वभूमीमुळे लॉकडाऊनच्या काळात लिलाव बंद होते. माल विकला जात नाही. शेतकरी मरणयातना भोगत असताना शेतमाल विकला जात नव्हता. तसेच शेतकºयाची आर्थिक कोंडी झाली असताना शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शेतकºयांसाठी असलेला योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे न करता अडथळे निर्माण होत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याची मागणी होत आहे.योजना यशस्वी करण्यासाठी नियोजन व इच्छाशक्तीची आवश्यकता होती. मात्र मका मोजणीसाठी शेतकºयांना अतोनात त्रास सहन करावा लागला. तीन-चार दिवस नंबर लावून थांबण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली. मका मोजणी योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. खुल्या बाजारात १३०० पर्यंत दर मिळतो आहे. ५०० रुपये जास्त दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी हतबल झाला आहे. इतक्या वेळखाऊ आणि त्रासदायक योजना नको असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार