शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मालेगावची मका खरेदी योजना अडकली वादाच्या भोवºयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:52 IST

मालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे असहकार्य : शेतकी संघ अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांची हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.दीड महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करूनही अनेक शेतकºयांचा मका मोजला गेला नाही. शिवाय तालुक्यात केंद्र शासनाचीकिमान आधारभूत किंमत भरडधान्य खरेदी योजना बंद झाली. या कुचकामी योजनेमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकºयांना आर्थिक डबघाईस सामोरे जावे लागतआहे.उघड्यावर पडलेल्या मक्याचे नुकसानशेतकरीहिताच्या योजना तत्काळ राबवल्या जात नसल्याने सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे. निसर्गाचा प्रकोप, कोरोनाचे सावट अशा चक्रव्यूहात सापडलेला बळीराजा धास्तावला आहे. शासनाने योजनेची घोषणा केली नसती तर शेतकºयांनी मिळेल त्या दरात मका विक्री केली असती. आज मोजणी होईल, उद्या होईल या आशेवर बळीराजा होता; मात्र दररोज फक्त आठ ते दहा शेतकºयांचा मका मोजला जात होता. एक पोते मका मोजण्यासाठी ३० रुपये वसूल केले जात होते, अशी कैफियत एका शेतकºयाने मांडली.मका खरेदी होत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या जीवनाशी खेळ होत आहे. उघड्यावर पडलेला मकाचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने खराब होत चाललेल्या मका पिकाचे काय करावे, या समस्येने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. शेतकºयांची अवस्था चिंताजनक असून, सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटात सापडलेला शेतकरी भरडला जात आहे.आर्थिक कोंडीकोरोना पार्श्वभूमीमुळे लॉकडाऊनच्या काळात लिलाव बंद होते. माल विकला जात नाही. शेतकरी मरणयातना भोगत असताना शेतमाल विकला जात नव्हता. तसेच शेतकºयाची आर्थिक कोंडी झाली असताना शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शेतकºयांसाठी असलेला योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे न करता अडथळे निर्माण होत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याची मागणी होत आहे.योजना यशस्वी करण्यासाठी नियोजन व इच्छाशक्तीची आवश्यकता होती. मात्र मका मोजणीसाठी शेतकºयांना अतोनात त्रास सहन करावा लागला. तीन-चार दिवस नंबर लावून थांबण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली. मका मोजणी योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. खुल्या बाजारात १३०० पर्यंत दर मिळतो आहे. ५०० रुपये जास्त दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी हतबल झाला आहे. इतक्या वेळखाऊ आणि त्रासदायक योजना नको असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार